शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

उस्मानाबादेत दिशा समितीच्या ६० टक्के बैठकांना खासदारांची दांडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:17 IST

सहा बैठकांना समितीचे अध्यक्ष असलेले खा. रविंद्र गायकवाड यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देविकासाला ‘दिशा’ मिळणार कशी? पाच वर्षात २० ऐवजी दहाच बैठका

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण तसेच शहरी भागाच्या विकासासाठी २२ ते २४ योजना राबविल्या जातात. सदरील योजनांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी व्हावी, यासाठी दिशा समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्याला आढावा घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार पाच वर्षात २० बैठका घेणे बंधनकारक असताना आजवर केवळ १० बैठका झाल्या. यापैकीही सहा बैठकांना समितीचे अध्यक्ष असलेले खा. रविंद्र गायकवाड यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. असे असतानाच मागील सहा महिन्यांत एकही बैठक झालेली नाही, हे विशेष.

केंद्र सरकारच्या वतीने  सर्वसामान्यांच्या विकासासाठी रोजगार हमी, दिन दयाळ अंत्योदय, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय  सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत मिशन सारख्या २० ते २२ योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधीचा निधी मंजूर असतो. सदरील योजना पूर्ण क्षमतेने राबविल्या जातात की नाही, याचा आढावा घेण्यासाठी सरकारने दिशा समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद खासदार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. खासदारांनी दर तीन महिन्याला बैठका घेऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे अपेक्षित आहे. परंतु, मागील पाच वर्षातील समितीच्या कार्यपद्धतीबाबत चित्र पाहिले असता, विदारक वास्तव समोर येते.

पाच वर्षांमध्ये किमान २० बैठका होणे अपेक्षित होते. परंतु, ज्यांच्यावर जिल्ह्याच्या विकासाची धुरा आहे, त्यांनाच बैठका घेण्यास वेळ नाही की काय म्हणून ५० टक्के म्हणजेच अवघ्या दहा बैठका झाल्या. यामध्ये २०१४ मध्ये २९ आॅगस्ट रोजी पहिली बैठक झाली. या पहिल्याच बैठकीला खासदार रविंद्र गायकवाड यांनी दांडी मारली.  यानंतर २९ नोव्हेंबर २०१४ रोजी दुसरी बैठक झाली. बैठकीला ते हजर राहिले. २०१५ या आर्थिक वर्षातही बैठकांची संख्या दोनच्या पुढे सरकली नाही. २२ जून व  ३० डिसेंबर  रोजी झालेल्या दोन्ही बैठकांना त्यांनी हजेरी लावली. यानंतर २०१६ या वर्षात २७ जून, १३ आॅगस्ट आणि २१ डिसेंबर अशा तीन बैठका झाल्या. बैठकांची संख्या एकने वाढली.

परंतु, यापैकी एकाही बैठकीला उपस्थित राहण्याचे तसदी खा. गायकवाड घेतली नाही. २०१७ मध्ये बैठकांची संख्या पुन्हा कमी झाली. या वर्षात केवळ दोनच बैठका घेतल्या गेल्या. ५ जून आणि ५ आॅक्टोबर रोजी या बैठका झाल्या. परंतु, या दोन्हीही बैठकांना त्यांनी दांडी मारली. ५ जूनची बैठक आमदार सुजितसिंह ठाकूर यांना घ्यावी लागली.केंद्र सरकारच्या नीती आयोगाने उस्मानाबादचा समावेश मागास जिल्ह्यांच्या यादीत केला. त्यामुळे २०१८ मध्ये तरी दिशा समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला विकासाची दिखविण्याचे काम होईल, असे अपेक्षित होते. परंतु, याहीवेळा उस्मानाबादकरांची निराशा झाली. बैठकांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली. अख्ख्या आर्थिक वर्षात एकच बैठक (३१ आॅगस्ट) झाली. या बैठकीला खासदार प्रा. गायकवाड यांनी हजेरी लावली. यानंतर जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मार्चअखेर तोंडावर येऊन ठेपला आहे. असे असतानाही दिशा समितीची बैठक घेण्यास मुहूर्त मिळालेला नाही, हे विशेष.

टॅग्स :Ravindra Gaikwadरवींद्र गायकवाडOsmanabadउस्मानाबादUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषद