शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीचे टार्गेट पूर्ण करा, नाहीतर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात रीडिंग न घेताच बिले दिल्याच्या कारणावरून बराच गहजब झाला होता. त्यामुळे अनेकांनी बिलेही भरली नाहीत. ...

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात रीडिंग न घेताच बिले दिल्याच्या कारणावरून बराच गहजब झाला होता. त्यामुळे अनेकांनी बिलेही भरली नाहीत. दरम्यान, आता वसुली थांबलेली असल्याने महावितरणच्या तिजोरीतील कॅश फ्लो थांबला आहे. परिणामी, सहव्यवस्थापकीय संचालकांनी कठोर पवित्रा घेतला असून, अभियंत्यांवर वसुलीची जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. टार्गेट पूर्ण नाही झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.

लॉकडाऊन कालावधीत महावितरणकडून वसुलीला काहीशी ढील देण्यात आली होती. मार्च एंड असला तरी त्यापूर्वी वाढीव बिले दिल्याच्या कारणावरून झालेल्या गोंधळामुळेही वीज बिल वसुली करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक ग्राहक सोडून कृषी वीज बिलांच्या मागे महावितरण धावत होती. यानंतर मात्र वसुली पूर्णत: थंडावली आहे. त्यामुळे महावितरणच्या तिजोरीत जमा होणारी रक्कम आटली आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागात अधिक थकबाकी असल्याने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनीही वेळोवेळी या विभागाला फटकारले आहे. यामुळे औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी आता अभियंत्यांनाच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. मुख्य कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला देण्यात येणारे टार्गेट हे पूर्णच झाले पाहिजे, अन्यथा संबंधित अभियंत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. मंगेश गोंदावले यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.

कोणावर कशी आहे जबाबदारी...

२५ हजार रुपयांपर्यंत थकीत वीज बिल वसुलीची जबाबदारी ही शाखा अभियंत्यांवर असणार आहे. २५ ते ५० हजार रुपयांदरम्यानची थकबाकी ही उपविभागीय अभियंत्यांना वसूल करावयाची आहे. ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत असलेली थकबाकी ही कार्यकारी अभियंत्यांना वसूल करावी लागणार आहे. १ ते ५ लाख रुपयांपर्यंत अधीक्षक अभियंता तर ५ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असेल तरी मुख्य अभियंत्यांनाच वसुलीत लक्ष घालावे लागणार आहे.

आताही लाईनमनवरच ढकलणार का...

महावितरणमध्ये तांत्रिक जबाबदारीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या लाईनमनवरच वसुलीचा भार टाकण्याची प्रथा पडली आहे. अभियंत्यांचा टार्गेटचा भार ही लाईनमन मंडळीच वाहून नेत आहे. त्यात कमी पडले की लाईनमनवरच कारवाई केली जाते. त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्नही घडतो. मात्र, आता सहव्यवस्थापकीय संचालकांनी अभियंत्यांचीच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. तेव्हा हे अभियंते वसुलीसाठी बाहेर पडणार की पुन्हा लाईनमनच्या खांद्यावर बंदुका ठेवणार, याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा आहेत.