शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वसुलीचे टार्गेट पूर्ण करा, नाहीतर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात रीडिंग न घेताच बिले दिल्याच्या कारणावरून बराच गहजब झाला होता. त्यामुळे अनेकांनी बिलेही भरली नाहीत. ...

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात रीडिंग न घेताच बिले दिल्याच्या कारणावरून बराच गहजब झाला होता. त्यामुळे अनेकांनी बिलेही भरली नाहीत. दरम्यान, आता वसुली थांबलेली असल्याने महावितरणच्या तिजोरीतील कॅश फ्लो थांबला आहे. परिणामी, सहव्यवस्थापकीय संचालकांनी कठोर पवित्रा घेतला असून, अभियंत्यांवर वसुलीची जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. टार्गेट पूर्ण नाही झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.

लॉकडाऊन कालावधीत महावितरणकडून वसुलीला काहीशी ढील देण्यात आली होती. मार्च एंड असला तरी त्यापूर्वी वाढीव बिले दिल्याच्या कारणावरून झालेल्या गोंधळामुळेही वीज बिल वसुली करण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक ग्राहक सोडून कृषी वीज बिलांच्या मागे महावितरण धावत होती. यानंतर मात्र वसुली पूर्णत: थंडावली आहे. त्यामुळे महावितरणच्या तिजोरीत जमा होणारी रक्कम आटली आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागात अधिक थकबाकी असल्याने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनीही वेळोवेळी या विभागाला फटकारले आहे. यामुळे औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी आता अभियंत्यांनाच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. मुख्य कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला देण्यात येणारे टार्गेट हे पूर्णच झाले पाहिजे, अन्यथा संबंधित अभियंत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. मंगेश गोंदावले यांनी बुधवारी काढलेल्या पत्रान्वये दिला आहे.

कोणावर कशी आहे जबाबदारी...

२५ हजार रुपयांपर्यंत थकीत वीज बिल वसुलीची जबाबदारी ही शाखा अभियंत्यांवर असणार आहे. २५ ते ५० हजार रुपयांदरम्यानची थकबाकी ही उपविभागीय अभियंत्यांना वसूल करावयाची आहे. ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत असलेली थकबाकी ही कार्यकारी अभियंत्यांना वसूल करावी लागणार आहे. १ ते ५ लाख रुपयांपर्यंत अधीक्षक अभियंता तर ५ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असेल तरी मुख्य अभियंत्यांनाच वसुलीत लक्ष घालावे लागणार आहे.

आताही लाईनमनवरच ढकलणार का...

महावितरणमध्ये तांत्रिक जबाबदारीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या लाईनमनवरच वसुलीचा भार टाकण्याची प्रथा पडली आहे. अभियंत्यांचा टार्गेटचा भार ही लाईनमन मंडळीच वाहून नेत आहे. त्यात कमी पडले की लाईनमनवरच कारवाई केली जाते. त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्नही घडतो. मात्र, आता सहव्यवस्थापकीय संचालकांनी अभियंत्यांचीच जबाबदारी निश्चित करून दिली आहे. तेव्हा हे अभियंते वसुलीसाठी बाहेर पडणार की पुन्हा लाईनमनच्या खांद्यावर बंदुका ठेवणार, याकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा आहेत.