शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नीट न देता मेडिकल प्रवेश; तज्ज्ञ, विद्यार्थ्यांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

उमरगा : तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्षाने सोमवारी विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि ‘नीट’ या देश पातळीवरील प्रवेश ...

उमरगा : तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्षाने सोमवारी विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि ‘नीट’ या देश पातळीवरील प्रवेश परीक्षेतून सूट देणारे विधेयक पास केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना १२ वीच्या गुणांवर आधारित एमबीबीएस, बीडीएसमध्ये प्रवेश मिळणार आहे. यामुळे देशभरातील इतर राज्यांतील वैद्यकीय प्रवेशाबाबतचे वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातूनही या निर्णयावर तज्ज्ञांच्या विविध प्रक्रिया येत आहेत. बहुतांश ठिकाणी या निर्णयाला पाठिंबा दिला जात आहे, तर अनेक ठिकाणी अयोग्य निर्णय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नीट परीक्षेवर लक्ष केंद्रित केल्याने बारावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच १५ टक्के कोट्यातून प्रवेश घेताना पुन्हा विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावी लागणार आहे. केवळ ‘नीट’ परीक्षेवर लक्ष देऊन ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, त्यांनी याचिका दाखल केल्यास प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडण्याचा धोका आहे. तामिळनाडूप्रमाणे इतर राज्यांनी अनुकरण केल्यास ‘नीट’ परीक्षेला अर्थ राहणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बारावीतील गुणांच्या आधाराऐवजी ‘नीट’ परीक्षेद्वारेच वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे मत प्रवेश प्रक्रियेतील मार्गदर्शक, समुपदेशकांनी व्यक्त केले.

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

राज्यातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेने संमत केले. या विधेयकामुळे सरकारी आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांवर बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश मिळणार आहे.

धक्कादायक निर्णय

तामिळनाडूमध्ये संसदेतून ‘ॲन्टी नीट बिल’ पारित करून एका अर्थाने सीबीएसई सिलॅबस अमान्य केला आहे. स्टेट सिलॅबसमध्ये व सीबीई सिलॅबसमध्ये फार तफावत असल्यामुळे व ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांच्या अभावामुळे तामिळनाडूमधील गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, असे राजकारणी लोकांना वाटते. स्टेट बोर्ड परीक्षेतील मूल्यांकन पद्धत कुठल्याही सामाजिक स्तरातील कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे.

- गुंडाजीबापू मोरे, प्राचार्य, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा

‘नीट’ परीक्षा रद्द केल्यास गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. अशाने गुणवत्ता घसरेल. यासाठी ऑनलाइन परीक्षेसारखे पर्याय निवडता येतील. वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. त्याची तयारी दोन ते अडीच वर्षे विद्यार्थी करतात. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. कोरोनामुळे बारावीची अंतिम लेखी परीक्षा झालेली नसल्याने ‘नीट’द्वारेच प्रवेश व्हावेत.

- डॉ. मन्मथ माळी, प्राचार्य, आदर्श कॉलेज, उमरगा

विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

गेल्या सहा वर्षांपासून अनेक हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांचे ‘नीट’ मुळे एम.बी.बी.एस. शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले. बारावीच्या गुणांवर प्रवेश देणे म्हणजे हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यासारखे होईल.

- प्रणिता पद्माकर मोरे, विद्यार्थिनी

तामिळनाडू शासनाने घेतलेल्या निर्णयावर विद्यार्थी म्हणून मी खूप निराश आहे. मुळात जर दर्जात्मक शिक्षण हवे असेल तर ‘नीट’द्वारेच वैद्यकीय शिक्षणास प्रवेश मिळावा. अन्यथा, दोन वर्षे कसून अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल.

- शबनम पठाण, विद्यार्थिनी