शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

By बाबुराव चव्हाण | Updated: July 11, 2024 19:51 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमका आजार काय, याची तपासणी करून येण्याचे निर्देश दिले आहेत.

धाराशिव : सातत्याने वैद्यकीय रजा घेऊन महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार लटकली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच पुन्हा १२ दिवसांच्या रजेचा केलेला अर्ज फेटाळून जिल्हाधिकाऱ्यांनी नेमका आजार काय, याची तपासणी करून येण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विभागीय आयुक्तांकडे प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्तावही बुधवारी पाठवून दिला.

धाराशिव उपविभागाचे उपजिल्हाधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. निवडणूक विषयक तसेच भूसंपादन, तुळजापूर रेल्वे प्रकल्प, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त तसेच लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची कामे त्यांच्याकडे आहेत. मात्र, डव्हळे हे सातत्याने वैद्यकीय रजा घेत असल्याने ही कामे प्रलंबित राहिली आहेत. यामुळे जनमानसात प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी त्यांची बारा दिवसांची अर्जित रजा नामंजूर केली आहे. तसेच विभागीय आयुक्तांकडे प्रशासकीय कार्यवाहीसाठी प्रस्तावही पाठवून दिला आहे. यावर आता आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे नजरा लागल्या आहेत.

उपचारासाठी किती दिवस लागतात...डव्हळे यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रातून त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे, त्यावर उपचारासाठी किती दिवस लागू शकतात, याचा कसलाही बोध होत नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे रजा नामंजूर करून डव्हळे यांना सोलापूरच्या स्थायी वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

एकतर्फी पदभार घ्या...डव्हळे यांचा पदभार पुढील आदेशापर्यंत पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांना एकतर्फी पदभार स्वीकारून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

तक्रारींचा रतीब, उत्तरेही देईनात...डव्हळे यांच्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. रेल्वे भूसंपादनाचा मावेजा तीन महिन्यांपासून प्रलंबित ठेवला. भटके विमुक्त जातीचे प्रमाणपत्र ५ महिने उलटूनही निर्णय घेईनात. मंदिरातील कामांची देयके देण्यास जाणीवपूर्वक विलंब करीत आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाच्या भूसंपादन विषयक बैठकींना दांडी मारली. त्यांच्याकडील कामे दुसऱ्यांकडे वर्ग करण्याचे पत्र देणे, विधिज्ञांना अपमानास्पद वागणूक देऊन मोबाइल पाहत बसणे, बजावलेल्या नोटिसांना कसलेही उत्तर न देणे, अशी विविध कारणे शिस्तभंगाच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा प्रस्ताव नमूद केल्या आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcollectorजिल्हाधिकारी