शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

काेराेनाच्या काळात कुपाेषणही बळावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

उस्मानाबाद -काेराेना संकटाचा विविध क्षेत्रांना फटका बसला असताना यातून बालकांचे पाेषणही सुटलेले नाही. काेराेनाच्या काळात ग्रामीण भागातील कुपाेषण जवळपास ...

उस्मानाबाद -काेराेना संकटाचा विविध क्षेत्रांना फटका बसला असताना यातून बालकांचे पाेषणही सुटलेले नाही. काेराेनाच्या काळात ग्रामीण भागातील कुपाेषण जवळपास दुप्पटीहून अधिक वाढले आहे. काेराेनापूर्वी जिलह्यात तीव्र कुपाेषित बालकांची संख्या अवघी ७८ एवढी हाेती. सध्या ही संख्या १७२ वर जाऊन ठेपली आहे. तर मध्यम कुपाेषित बालकांची संख्या १ हजार ५९८ एवढी झाली. त्यामुळे हे बळावलेल्या कुपाेषण कमी करण्यासाठी ठाेस उपाययाेजना हाती घ्याव्या लागणार आहेत.

काेराेनाच्या संकटात लहान-माेठे व्यवसाय अडचणीत आले. अनेकांच्या हातचे राेजगार गेले. यातूनच अर्थकारण काेलमडले. अशा वेगवेगळ्या घटकांसाेबतच काेराेनाच्या फटक्यातून बालकांचे पाेषणही सुटलेले नाही. काेराेनाच्या काळात जिल्ह्यात नेमके कुपाेषण वाढले की कमी झाले, हे पडताळण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा याेजनेतून १५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत धडक शाेध माेहीम राबविण्यात आली. त्यानुसार अनेक धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. काेराेना संकटापूर्वी जिल्ह्यात तीव्र कुपाेषित (सॅम) बालकांची संख्या अवघी ७८ एवढी हाेती. परंतु, आजघडीला ही संख्या तब्बल दुप्पटीपेक्षा अधिक वाढून १७२ वर जाऊन ठेपली आहे. मध्यम कुपाेषित बालकांच्या संख्येबाबतही फारसे वेगळे चित्र नाही. ही संख्या सुमारे दीड हजारांवर जाऊन ठेपली आहे. आजघडीला १ हजार ५९८ बालके मध्यम कुपाेषणाच्या तावडीत सापडली आहेत. हे चित्र प्रशासनासह लाेकप्रतिनिधींची चिंता वाढविणारे आहे. याबाबतीत ठाेस उपाययाेजना करण्याची गरज आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

चाैकट...

तुळजापूर, मुरूम प्रकल्पात सर्वाधिक बालके...

जिल्ह्यातील दहा प्रकल्पांमध्ये मिळून जवळपास पावणेदाेनशे बालके तीव्र कुपाेषित असल्याचे शाेध माेहिमेतून स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कुपाेषित बालके तुळजापूर व मुरूम मंडळात असल्याचे हाती आलेल्या आकडेवारीवर स्पष्ट हाेते. प्रत्येकी २७ बालके तीव्र कुपाेषणाच्या दाढेत आहेत. यानंतर भूम प्रकल्पात आठ, परंडा १२, वाशी १३, कळंब १८, तेर २१, उस्मानाबाद १३, लाेहारा १६ आणि उमरगा मंडळात १७ बालकांचा समावेश आहे.

कळंब, तेरमध्ये सर्वाधिक मध्यम कुपाेषित बालके

मध्यम कुपाेषित बालकांची संख्या सुमारे दीड हजाराहून अधिक आहे. कळंब आणि तेर मंडळातील ही संख्या इतरांच्या तुलनेत अधिक आहे. अनुक्रमे २३२ व २२८ बालके अशा स्वरूपाच्या कुपाेषणाशी झगडत आहेत. तसेच भूम प्रकल्पात १३४, परंडा १४८, वाशी १३५, उस्मानाबाद १७५, लाेहारा ७३, तुळजापूर २१७, मुरूम ७० तर, उमरगा प्रकल्पामध्ये १८६ बालके मध्यम (मॅम) कुपाेषित आहेत.

चाैकट...

महिला व बालकल्याण विभागाकडून १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत कुपाेषित बालकांचा शाेध घेण्यासाठी धडक माेहीम राबविली. या माेहिमेतून जिल्ह्यात १७२ बालके तीव्र कुपाेषित निघाली. तर १ हजार ५९८ बालके मध्यम कुपाेषित असल्याचे समाेर आले आहे. अशा बालकांना कुपाेषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. त्यास निश्चित यश येईल.

-बळीराम निपाणीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि).