शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पावसाची ओढ, शेतीला वीज नीट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्हाभरातील खरीप पिके अडचणीत आली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी पिकांना विद्युत पंपाद्वारे पाणी देण्यास सुरुवात ...

उस्मानाबाद : पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्हाभरातील खरीप पिके अडचणीत आली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी पिकांना विद्युत पंपाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यात महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने विघ्न निर्माण झाले आहे. तातडीने यात लक्ष घालून सुरळीत वीजपुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अधीक्षक अभियंत्यांना भेटून दिला.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यातच महावितरणकडून सततची लोडशेडिंग व कमी दाबाने विद्युत पुरवठा करणे, अनियमित वीज असे प्रकार सुरू आहेत, तसेच खराब झालेली रोहित्रेही दुरुस्त करून मिळण्यामध्ये अडचण होत आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना व शेतातील विहिरीत, बोअरवेल, तळ्यात पाणी असताना महावितरणच्या ढिसाळ नियोजनाने पिकास पाणी देता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

या अडचणी सोडवून तातडीने जिल्ह्यातील कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भाजपच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांना दिला. याबाबतचे निवेदनही त्यांना देऊ केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, नामदेव नायकल, ओम नाईकवाडी, श्रीकांत तेरकर, आशिष नायकल, गणेश मोरे, अभिराम पाटील, स्वप्निल पाटील, अभय इंगळे, प्रवीण पाठक, विजय शिंगाडे, हिमत भोसले, सुनील पंगुडवाले उपस्थित होते.