शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पावसाची ओढ, शेतीला वीज नीट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्हाभरातील खरीप पिके अडचणीत आली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी पिकांना विद्युत पंपाद्वारे पाणी देण्यास सुरुवात ...

उस्मानाबाद : पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्हाभरातील खरीप पिके अडचणीत आली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांनी पिकांना विद्युत पंपाद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यात महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने विघ्न निर्माण झाले आहे. तातडीने यात लक्ष घालून सुरळीत वीजपुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अधीक्षक अभियंत्यांना भेटून दिला.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यातच महावितरणकडून सततची लोडशेडिंग व कमी दाबाने विद्युत पुरवठा करणे, अनियमित वीज असे प्रकार सुरू आहेत, तसेच खराब झालेली रोहित्रेही दुरुस्त करून मिळण्यामध्ये अडचण होत आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना व शेतातील विहिरीत, बोअरवेल, तळ्यात पाणी असताना महावितरणच्या ढिसाळ नियोजनाने पिकास पाणी देता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

या अडचणी सोडवून तातडीने जिल्ह्यातील कृषी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भाजपच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांना दिला. याबाबतचे निवेदनही त्यांना देऊ केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड.खंडेराव चौरे, रामदास कोळगे, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, नामदेव नायकल, ओम नाईकवाडी, श्रीकांत तेरकर, आशिष नायकल, गणेश मोरे, अभिराम पाटील, स्वप्निल पाटील, अभय इंगळे, प्रवीण पाठक, विजय शिंगाडे, हिमत भोसले, सुनील पंगुडवाले उपस्थित होते.