शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कळंब येथे तंत्रशुद्ध शेतीचे महिला शेतकऱ्यांना धडे; जीवनमान उंचावण्यासाठी होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:31 IST

शेतकरी कुंटूबातील महिलांचाही शेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे.

कळंब (उस्मानाबाद )  : शेतकरी कुंटूबातील महिलांचाहीशेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे. हाच धागा पकडून कळंब येथील पर्याय संस्थेने तालुक्यातील तीन गावांतील ६४ महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

हसेगाव (के) ता. कळंब येथील पर्याय सामाजिक संस्था गत अनेक वर्षापर्यंत कळंब तालुक्यातील विविध गावात रचनात्मक कार्य करत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. महिलांचे संघटन करून, बचतगटांच्या माध्यमातून त्यांच्या अर्थकारणाला बळ दिले जात आहे.एकल महिलांचे संघटन करून त्यांना आत्मनिर्भर केले जात आहे. विविध लघु, गृह व शेतीपूरक उद्योग करण्याची प्रेरणा देवून महिलांना स्वयंसिद्धा म्हणून पुढे आणले जात आहे. ‘पर्याय’चे प्रमुख विश्वनाथ तोडकर यांच्या प्रयत्नांतून या कार्यासोबतच पर्यायने विविध उद्योगांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून जलसंधारण व जलजागृतीचे काम केले आहे.

यातून अनेक नदी, नाल्यांनी मोकळा श्वास तर घेतला आहेच, शिवाय कोट्यावधी लिटर पाणी साठवले गेले आहे. पन्नासपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या कुंटुबाना हक्काचे घरकूल दिले आहे. विधायक व रचनात्मक कार्यात सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पर्याय संस्थेने आता सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या सहयोगातून शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी महिला शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध शेतीची दिशा देण्याचा संकल्प केला आहे. अनेक कुटुंबातील शेतीमध्ये पुरूषांइतकेच महिलांचेही योगदान असते. यामुळेच प्रशिक्षण कार्यक्रमात महिला हा घटक समोर ठेवून नियोजन करण्यात आले आहे.

यानुसार मंगळवारी कळंब पंचायत समितीच्या सभागृहात एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्यायचे प्रमूख विश्वनाथ तोडकर, गट विकास अधिकारी राजगुरू, तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, विलास गोडगे, अशोक तोडकर, सुनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बालाजी शेंडगे, सुनंदा खराटे,विकास कुदळे, असीफ मुलानी, दत्तात्रय ताटे, आश्रूबा गायकवाड, जयश्री शेनमारे, सुनीता मते, हनुमंत धोंगडे, नरसिंग मते यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आश्रूबा गायकवाड यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीWomenमहिला