शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

कळंब येथे तंत्रशुद्ध शेतीचे महिला शेतकऱ्यांना धडे; जीवनमान उंचावण्यासाठी होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:31 IST

शेतकरी कुंटूबातील महिलांचाही शेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे.

कळंब (उस्मानाबाद )  : शेतकरी कुंटूबातील महिलांचाहीशेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे. हाच धागा पकडून कळंब येथील पर्याय संस्थेने तालुक्यातील तीन गावांतील ६४ महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

हसेगाव (के) ता. कळंब येथील पर्याय सामाजिक संस्था गत अनेक वर्षापर्यंत कळंब तालुक्यातील विविध गावात रचनात्मक कार्य करत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. महिलांचे संघटन करून, बचतगटांच्या माध्यमातून त्यांच्या अर्थकारणाला बळ दिले जात आहे.एकल महिलांचे संघटन करून त्यांना आत्मनिर्भर केले जात आहे. विविध लघु, गृह व शेतीपूरक उद्योग करण्याची प्रेरणा देवून महिलांना स्वयंसिद्धा म्हणून पुढे आणले जात आहे. ‘पर्याय’चे प्रमुख विश्वनाथ तोडकर यांच्या प्रयत्नांतून या कार्यासोबतच पर्यायने विविध उद्योगांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून जलसंधारण व जलजागृतीचे काम केले आहे.

यातून अनेक नदी, नाल्यांनी मोकळा श्वास तर घेतला आहेच, शिवाय कोट्यावधी लिटर पाणी साठवले गेले आहे. पन्नासपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या कुंटुबाना हक्काचे घरकूल दिले आहे. विधायक व रचनात्मक कार्यात सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पर्याय संस्थेने आता सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या सहयोगातून शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी महिला शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध शेतीची दिशा देण्याचा संकल्प केला आहे. अनेक कुटुंबातील शेतीमध्ये पुरूषांइतकेच महिलांचेही योगदान असते. यामुळेच प्रशिक्षण कार्यक्रमात महिला हा घटक समोर ठेवून नियोजन करण्यात आले आहे.

यानुसार मंगळवारी कळंब पंचायत समितीच्या सभागृहात एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्यायचे प्रमूख विश्वनाथ तोडकर, गट विकास अधिकारी राजगुरू, तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, विलास गोडगे, अशोक तोडकर, सुनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बालाजी शेंडगे, सुनंदा खराटे,विकास कुदळे, असीफ मुलानी, दत्तात्रय ताटे, आश्रूबा गायकवाड, जयश्री शेनमारे, सुनीता मते, हनुमंत धोंगडे, नरसिंग मते यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आश्रूबा गायकवाड यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीWomenमहिला