शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथे तंत्रशुद्ध शेतीचे महिला शेतकऱ्यांना धडे; जीवनमान उंचावण्यासाठी होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 15:31 IST

शेतकरी कुंटूबातील महिलांचाही शेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे.

कळंब (उस्मानाबाद )  : शेतकरी कुंटूबातील महिलांचाहीशेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे. हाच धागा पकडून कळंब येथील पर्याय संस्थेने तालुक्यातील तीन गावांतील ६४ महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

हसेगाव (के) ता. कळंब येथील पर्याय सामाजिक संस्था गत अनेक वर्षापर्यंत कळंब तालुक्यातील विविध गावात रचनात्मक कार्य करत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. महिलांचे संघटन करून, बचतगटांच्या माध्यमातून त्यांच्या अर्थकारणाला बळ दिले जात आहे.एकल महिलांचे संघटन करून त्यांना आत्मनिर्भर केले जात आहे. विविध लघु, गृह व शेतीपूरक उद्योग करण्याची प्रेरणा देवून महिलांना स्वयंसिद्धा म्हणून पुढे आणले जात आहे. ‘पर्याय’चे प्रमुख विश्वनाथ तोडकर यांच्या प्रयत्नांतून या कार्यासोबतच पर्यायने विविध उद्योगांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगातून जलसंधारण व जलजागृतीचे काम केले आहे.

यातून अनेक नदी, नाल्यांनी मोकळा श्वास तर घेतला आहेच, शिवाय कोट्यावधी लिटर पाणी साठवले गेले आहे. पन्नासपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या कुंटुबाना हक्काचे घरकूल दिले आहे. विधायक व रचनात्मक कार्यात सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पर्याय संस्थेने आता सुमंत मुळगावकर डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या सहयोगातून शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी महिला शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध शेतीची दिशा देण्याचा संकल्प केला आहे. अनेक कुटुंबातील शेतीमध्ये पुरूषांइतकेच महिलांचेही योगदान असते. यामुळेच प्रशिक्षण कार्यक्रमात महिला हा घटक समोर ठेवून नियोजन करण्यात आले आहे.

यानुसार मंगळवारी कळंब पंचायत समितीच्या सभागृहात एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्यायचे प्रमूख विश्वनाथ तोडकर, गट विकास अधिकारी राजगुरू, तालुका कृषी अधिकारी अशोक संसारे, विलास गोडगे, अशोक तोडकर, सुनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बालाजी शेंडगे, सुनंदा खराटे,विकास कुदळे, असीफ मुलानी, दत्तात्रय ताटे, आश्रूबा गायकवाड, जयश्री शेनमारे, सुनीता मते, हनुमंत धोंगडे, नरसिंग मते यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आश्रूबा गायकवाड यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीWomenमहिला