शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी कायद्यांविरुद्ध विरोधकांची कोल्हेकुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

उस्मानाबाद : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधक हकनाक ओरड करीत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार ...

उस्मानाबाद : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधक हकनाक ओरड करीत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. मात्र, विरोधकांनी आपले साम्राज्य धोक्यात येईल, अशी अनाठायी भीती बाळगून कायद्यांच्या विरोधात कोल्हेकुई सुरू केली असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी गुरुवारी येथे केला.

किसान मोर्चाच्या वतीने राज्यभरात शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात येत आहे. त्याची सुरुवात तुळजापुरात देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली. यानंतर उस्मानाबादेत पत्रकारांशी संवाद साधताना वासुदेव काळे म्हणाले, मोदी सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताचे निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सूचनाही नोंदवून घेण्यात येणार आहेत. मोदी सरकारने २२ कोटी शेतकऱ्यांचे माती परीक्षण करून दिले. त्यामुळे रासायनिक खताचा वापर ८ ते १० टक्के कमी झाला आहे. ११ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत केली जात आहे. सिंचन योजना, पीक विम्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मोलाची मदत होत आहे. असे असतानाही विरोधक कायद्याचा बाऊ करून सांगत आहेत. बाजार समित्या धोक्यात येतील, असे सांगितले जात आहे. मात्र, निकोप स्पर्धा केल्यास समितीला कोणताही धोका नाही. मात्र, त्यांना शेतकरी हित नकोच आहे. विम्याच्या बाबतीतही तसेच आहे. गतवर्षी १ कोटी ३८ लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी केवळ १५ लाख शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. हे सरकार शेतकरी हितापेक्षा कंपनी हिताला व वसुलीला प्राधान्य देणारे असल्याची टीकाही काळे यांनी केली. यावेळी किसान मोर्चाचे मकरंद कोरडे, सुधाकर भोयर व रंगनाथ सोळंकी यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारी सदस्य व्यंकटराव गुंड, खंडेराव चौरे, सरचिटणीस नितीन भोसले, रामदास कोळगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चाचे विजय शिंगाडे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, राजकुमार पाटील, नानासाहेब कदम, साहेबराव घुगे, मकरंद पाटील, शिवाजीराव गिड्डे, अभय इंगळे, पूजा देडे, इकबाल मुल्ला, बालाजी सोनटक्के, गजानन वडणे व पदाधिकारी उपस्थित होते.