शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांविरुद्ध विरोधकांची कोल्हेकुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

उस्मानाबाद : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधक हकनाक ओरड करीत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार ...

उस्मानाबाद : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधक हकनाक ओरड करीत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. मात्र, विरोधकांनी आपले साम्राज्य धोक्यात येईल, अशी अनाठायी भीती बाळगून कायद्यांच्या विरोधात कोल्हेकुई सुरू केली असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी गुरुवारी येथे केला.

किसान मोर्चाच्या वतीने राज्यभरात शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात येत आहे. त्याची सुरुवात तुळजापुरात देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली. यानंतर उस्मानाबादेत पत्रकारांशी संवाद साधताना वासुदेव काळे म्हणाले, मोदी सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताचे निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सूचनाही नोंदवून घेण्यात येणार आहेत. मोदी सरकारने २२ कोटी शेतकऱ्यांचे माती परीक्षण करून दिले. त्यामुळे रासायनिक खताचा वापर ८ ते १० टक्के कमी झाला आहे. ११ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत केली जात आहे. सिंचन योजना, पीक विम्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मोलाची मदत होत आहे. असे असतानाही विरोधक कायद्याचा बाऊ करून सांगत आहेत. बाजार समित्या धोक्यात येतील, असे सांगितले जात आहे. मात्र, निकोप स्पर्धा केल्यास समितीला कोणताही धोका नाही. मात्र, त्यांना शेतकरी हित नकोच आहे. विम्याच्या बाबतीतही तसेच आहे. गतवर्षी १ कोटी ३८ लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी केवळ १५ लाख शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. हे सरकार शेतकरी हितापेक्षा कंपनी हिताला व वसुलीला प्राधान्य देणारे असल्याची टीकाही काळे यांनी केली. यावेळी किसान मोर्चाचे मकरंद कोरडे, सुधाकर भोयर व रंगनाथ सोळंकी यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारी सदस्य व्यंकटराव गुंड, खंडेराव चौरे, सरचिटणीस नितीन भोसले, रामदास कोळगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चाचे विजय शिंगाडे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, राजकुमार पाटील, नानासाहेब कदम, साहेबराव घुगे, मकरंद पाटील, शिवाजीराव गिड्डे, अभय इंगळे, पूजा देडे, इकबाल मुल्ला, बालाजी सोनटक्के, गजानन वडणे व पदाधिकारी उपस्थित होते.