शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

उस्मानाबाद जिल्ह्यात बावीसशे हेक्टरवरील खरीप पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:17 IST

पुराचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास ८८ हेक्टर्स जमीन गेली खरडून

उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. बुधवारपर्यंत बावीसशे हेक्टर्सवरील पिके पाण्यात राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे, तसेच पुराचे पाणी शेतात शिरल्याने जवळपास ८८ हेक्टर्स जमीन खरवडून गेली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १७ टक्के पाऊस हा अवघ्या दोनच दिवसांत झाला. त्यामुळे बुधवारी सरासरी ओलांडली गेली. जिल्ह्यात आजतागायत एकूण ६१४ मिमी (१०२ टक्के) पाऊस झाला आहे. १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील २,२६२ हेक्टर्स क्षेत्रावरील पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर नदी- ओढ्यांचे पाणी शिरून सुमारे ८८ हेक्टर्स शेती खरवडून गेली आहे.

दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा, तर परंडा तालुक्यात एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. सोबतच १३ मोठ्या व १५ लहान पशुधनाचाही मृत्यू झाला आहे. परंडा व भूम तालुक्यात ४ कच्च्या घरांची पडझड प्राथमिक माहितीतून समोर आली आहे. यामध्ये मनुष्यहानी झालेली नाही.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

सीना-कोळेगाव तहानलेलाच...

जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने इतर प्रकल्प आता भरत आले आहेत. मात्र, सर्वांत मोठा प्रकल्प असलेला सीना-कोळेगाव अजूनही तहानलेलाच आहे. ५०२ मीटर पूर्ण संचय पाणीपातळी असलेल्या प्रकल्पात आजघडीला उपयुक्त पाणीसाठा केवळ ०.४१ मीटर इतकाच आहे. येथे केवळ ०.४६ टक्के साठा बुधवारी उपलब्ध होता. दरम्यान, निम्न तेरणा व मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने येथील जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. तेरणामध्ये ७० टक्के, तर मांजरा धरणात ६३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यात आणखी वृद्धी सुरूच आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबाद