शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

अध्यात्मच नव्हे तर साहित्य, शिक्षण, सरकारी यंत्रणेतही निर्माण झाले बुवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 03:37 IST

ज्ञानोबांचे पसायदान, तुकोबांचे साहित्य कोणी समजूनच घेतले नाही़ त्यामुळे लोक कर्मकांडात गुरफटली अन् त्याचाच गैरफायदा घेणारे बुवा समाजात तयार झाल्याचा दावाही एदलाबादकर यांनी केला़

चेतन धनुरे 

उस्मानाबाद : संत साहित्याचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे बुवाबाजीचे प्रस्थ निश्चितच वाढले आहे़ परंतु, ते केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सरकारी यंत्रणेतही बुवा निर्माण झाले आहेत, असे मत विचारवंतांनी संमेलनातील परिसंवादात व्यक्त केले़

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सायंकाळी ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले/वाढते आहे’ या विषयावर परिसंवाद झाला़ अध्यक्षस्थानी सोमनाथ कोमरपंत होते़ यावेळी डॉ़मुरहरी केळे, प्रकाश एदलाबादकर, धनराज वंजारी, मार्तंड कुलकर्णी, सचिन जाधव यांनी आपली मते व्यक्त केली़

डॉ़मुरहरी केळे म्हणाले, संतांनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत़ मात्र, काही ढोंगी, बुवाबाजी करणाऱ्या अपप्रवृत्ती या साहित्याचा विपर्यास करुन लोकांची फसवणूक करतात़ किर्तनासाठीही काही लोक लाखाचे बोलतात. अशा धनसंचयी वृत्तीच्या बुवांवर तुकोबारायांनी त्यांच्या कालखंडात आसूड ओढले होते़

प्रकाश एदलाबादकर यांनी काहिश्या हटके पद्धतीने मांडणी करताना इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही खापर फोडले़ या शाळांतून आपल्या संतांच्या भूमीचा इतिहास शिकविला जात नाही़ त्यामुळे संत साहित्य लपले जाईल़ शिक्षणातील ही एक प्रकारची बुवाबाजीच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले़

ज्ञानोबांचे पसायदान, तुकोबांचे साहित्य कोणी समजूनच घेतले नाही़ त्यामुळे लोक कर्मकांडात गुरफटली अन् त्याचाच गैरफायदा घेणारे बुवा समाजात तयार झाल्याचा दावाही एदलाबादकर यांनी केला़ धनराज वंजारी यांनी सरकारी यंत्रणेतील बुवाबाजीवरही शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, ज्ञानेश्वरांनी पसायदानात समाज संरचना सांगितली़ मात्र, त्यातील मर्म विसरुन सरकारी यंत्रणेतील लोक ‘जो जे वांच्छिल, तो ते लाहो’ या वाक्याचा विपर्यास करीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत मिळकतीच्या मागे लागले आहेत़ ही सुद्धा एक प्रकारची बुवाबाजीच आहे़ ही बुवाबाजी आकलनातूनही संपणार नसून, त्यासाठी आचरणही आवश्यक असल्याचे वंजारी म्हणाले़

मार्तंड कुलकर्णी यांनी विषयाची मांडणी करताना समाजाच्या स्वैैराचारावर बोट ठेवले़ ते म्हणाले, संतांनी आपले साहित्य हे समाज सुधारणेसाठी निर्मिले होते़ मात्र, तद्नंतरच्या काळात त्याचा विपर्यास करुन बुवांनी समाजाला स्वैर केले़ ज्यांचे चित्तच शुद्ध नाही असे ढोंगी समाजात अंधश्रद्धा पेरत आहेत़ त्यामुळे संतांचे साहित्य घरोघरी पोहोचवून त्याचा खरा मर्म लोकांना सांगण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले़

डॉ़सचिन जाधव यांनी बुवाबाजीला सुशिक्षित, सधन लोकांमुळेच आश्रय मिळत असल्याचा दावा केला़ या व्यक्ती संकटे आली की आधार शोधत ढोंगी, बुवांना शरण जावून त्यात गुरफटतात़ समाजात हेच अनुकरण चालत राहते़ खरे पाहिल्यास यातून बाहेर पडण्याचा मार्ग संत साहित्यात आहे़ मात्र, समाजात उलटी गंगा वाहते आहे़ अध्यक्षीय समारोपात सोमनाथ कोमरपंत यांनी संत साहित्यावर आपले विवेचन करतानाच परिसंवादाचा सार मांडला़ परिसंवादाचे सूत्रसंचालन कमल नलावडे यांनी केले़ आभार एस़डी़ कुंभार यांनी मानले़ 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन