शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

विमा कंपनी तोंडघशी, पीक विम्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात २३ दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात २३ दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. परिणामी, पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के नुकसानभरपाई मिळू शकते. याच अनुषंगाने सोमवारी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे. हा आता नुकसानीचा पक्का पुरावा झाला असून, विमा कंपनीला आता नुकसानभरपाई द्यावीच लागणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे सर्वच मंडळांतील सोयाबीनचे ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान हे कळंब तालुक्यात झाले आहे. येथे उत्पन्नात सरासरी ६५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. तसेच भूम, परंडा, वाशी तालुक्यांतील काही मंडळात मूग व उडिदाचे तसेच परंडा तालुक्यातील काही मंडळात मका, बाजरी, तूर व कापसाचेही ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरला आहे. अशा शेतकऱ्यांना एकूण नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम आता पिकांच्या काढणीपूर्वी मिळणे शक्य आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीने नुकसानीबाबत उपस्थित केलेले विसंगत मुद्दे फेटाळून लावत सोमवारीच अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमुळे अग्रीम नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही अधिसूचना आता एकप्रकारचा पुरावाच झाला आहे. कंपनीने नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते आता निष्फळ ठरतील. याशिवाय, पुढे पुन्हा नैसर्गिक आपत्ती आली व खरीप पिकांचे नुकसान झाले तर पूर्ण विमा रक्कम पदरी पाडून घेण्यासाठीही ही अधिसूचना महत्त्वाची भूमिका बजावेल. शासनातर्फे विमा कंपनीशी करार करणारे कृषी सचिव या अधिसूचनेच्या आधारे कंपनीस नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देऊ शकतात.

कंपनीचा विरोध कशासाठी...

विमा कंपनीने जिल्ह्यातील खरीप पिकांचे ५० टक्के नुकसान झाल्याचा दावा नाकारला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ३० टक्केच नुकसान झाले आहे. मात्र, सर्वच लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनीही तांत्रिक ज्ञान नसलेले विमा प्रतिनिधी तज्ज्ञ समिती सदस्यांचा दावा फेटाळू शकत नाहीत, हा मुद्दा उचलून धरला. तेव्हा कंपनीलाही नरमाईची भूमिका घ्यावी लागली. याच मुख्य मुद्यावर कंपनी तोंडघशी पडली अन् अग्रीम नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, पुढे आणखी नुकसान झाल्यास पूर्ण नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागेल. त्यावेळी आताची अधिसूचना आणि २५ टक्के रक्कम द्यावी लागल्याचा भक्कम पुरावा तयारी होईल, अशी भीतीही कंपनीला आहे.