शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

तुळजापुरातील 'त्या' जागांचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : तुळजापुरातील तीर्थकुंड हडप प्रकरणातील आरोपी देवानंद रोचकरी यांच्यामागे आता आणखी नवे शुक्लकाष्ठ लागले आहे. शहरातील आणखी दोन ...

उस्मानाबाद : तुळजापुरातील तीर्थकुंड हडप प्रकरणातील आरोपी देवानंद रोचकरी यांच्यामागे आता आणखी नवे शुक्लकाष्ठ लागले आहे. शहरातील आणखी दोन मोक्याच्या जागा हडपल्याची तक्रार असल्याने त्याचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून गेले आहेत. यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

तुळजापुरातील बडी हस्ती देवानंद रोचकरी यांनी शहरातील मोक्याच्या जागा हडपल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या आहेत. मात्र, मंकावती तीर्थकुंड बनावट कागदपत्रे तयार करून तो आपल्या नावे लावल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही बाब गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर लागलीच रोचकरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात गेल्या महिनाभरापासून रोचकरी बंधू कोठडीत आहेत. आधी तुळजापूर न्यायालयाने आणि नंतर जिल्हा न्यायालयानेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हवाला देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने जिल्हा कारागृहातील रोचकरींचा मुक्काम वाढला आहे. दरम्यान, इकडे कोठडी भोगत असतानाच त्यांच्याबाबत आणखीही तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या. तुळजापुरातील जुन्या बसस्थानकासमोरील महसूलची मोक्याची जागा ताब्यात घेऊन तेथे कॉम्प्लेक्स उभे केल्याचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मोक्याची जागाही रोचकरींनी कब्जा केल्याची तक्रार करण्यात आली. त्याआधारे आता जिल्हाधिकारी कार्यालयाने या जागांचे हस्तांतर कसे झाले, हे मुळापासून शोधून काढण्यासाठी चौकशी लावली आहे. यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून, त्यांना लवकर चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यास सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे आधीच तीर्थकुंड प्रकरणात बेजार झालेल्या रोचकरींच्या मागे प्रशासनाने नवे शुक्लकाष्ठ लावून बेजारीत भर घातली आहे.