शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

तुळजापूरच्या विकास आराखड्याबाबत सूचना कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:18 IST

तुळजापूर : श्री क्षेत्र तुळजापूर विकासासाठी नव्याने आराखडा बनविण्यात येणार आहे. यासाठी शहरवासीयांनी आपल्या सूचना वेबसाईटवर द्याव्यात. त्यानुसार हा ...

तुळजापूर : श्री क्षेत्र तुळजापूर विकासासाठी नव्याने आराखडा बनविण्यात येणार आहे. यासाठी शहरवासीयांनी आपल्या सूचना वेबसाईटवर द्याव्यात. त्यानुसार हा आराखडा बनवून त्यास अंतिम मंजुरी देऊन तो शासनाकडे मांडला जाईल, अशी माहिती मंदिर संस्थानचे विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. शुक्रवारी तुळजापूर शहर व तुळजाभवानी मंदिर यांच्या विकासासंदर्भात आ. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, माजी नगरसेवक विनोद गंगणे, माजी जि. प. सदस्य गणेश सोनटक्के, आनंद कंदले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी आ. पाटील यांनी भविष्यात तुळजापूर शहर कसे असावे, यामध्ये काय काय असावे, येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारे सेवा सुविधा कशा देता येतील, याबाबत चर्चा केली. तसेच तुळजाभवानी मंदिरात भाविकांना बाहेर जाण्यासाठी नवीन मार्ग, नूतन अभिषेक मंडप, कमीत कमी वेळात लवकर दर्शन व्हावे यासाठी शहरातील सुज्ञ नागरिकांनी नवीन शहर विकास आराखड्यासाठी सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांन विश्वस्तांच्या बैठकीची माहिती दिली. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी ॲक्सेस पासची मर्यादा वाढविण्यात आली आहे. तसेच सशुल्क दरामध्ये शंभर रुपये कपात करण्यात आली आहे. पुजाऱ्यांच्या मागणीप्रमाणे येत्या पंधरा दिवसांतच मंदिरातील धार्मिक कुलाचार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे रखडलेले पगार लवकर होतील, असे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले....

चौकट.......

...तर ॲक्सेस पासबाबत फेरविचार केला जाईल

अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय व्हावे यासाठी उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे पत्र दिले आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असे सांगून ॲक्सेस पासमुळे देवी भाविकांना त्रास होत असेल तर त्याचा फेरविचार केला जाईल. मुळात एक्सेस पासमुळे भाविकांना लवकर दर्शन व्हावे हा उद्देश आहे. परंतु, हा उद्देश सफल होत नसेल तर याचा विचार करणे गरजेचे आहे.

निधीअभावी रेल्वेचे काम रखडले

तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची मागणी आपण रेल्वे खात्याकडे केली आहे. परंतु, दोन वर्षांपासून राज्य सरकार आपल्या वाट्याचा ५० टक्के निधी देत नसल्याने सोलापूर - तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेचे काम रखडले आहे. यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेणे गरजेचे आहे. शहरात अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी निधीसह प्रयत्न चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल. यासाठी प्राधिकरणाकडे पाठपुरावा चालू आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले.