शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रेल्वेची संख्या वाढल्याने व्यापारी, प्रवाशांची सोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : कोरोना संसर्गामुळे शासनाने बससह रेल्वेसेवादेखील काही महिने बंद ठेवली होती; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व ...

उस्मानाबाद : कोरोना संसर्गामुळे शासनाने बससह रेल्वेसेवादेखील काही महिने बंद ठेवली होती; परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असून, बस, रेल्वेसेवाही आता सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद रेल्वेस्थानकावरून सात गाड्या धावत आहेत. यातही मुंबई गाडीला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन बुकिंगची सुविधा असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली असून, मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेसेवा बंद होती. आता बहुतांश रेल्वे पूर्ववत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन तिकीट; प्रवाशांचा प्रतिसाद

रेल्वे प्रशासनाच्या वतीने ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण या सुविधेचा लाभ घेत आहेत. मुंबईला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने ऑनलाइन बुकिंगनेच तिकीट घेण्यावर भर आहे. दरम्यान, स्थानकावरही कोरोनाच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. सध्या ऑनलाइन तिकिटाला प्रवाशांची पसंती असल्याचे सांगण्यात आले.

सुरू असलेल्या रेल्वेगाड्या

लातूर-मुंबई

बीदर-मुंबई

हैदराबाद-हडपसर

कोल्हापूर-नागपूर

पनवेल-नांदेड

कोल्हापूर-धनबाद

सर्वाधिक गर्दी मुंबईला

जाणाऱ्या प्रवाशांची

मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे. त्यामुळे रात्री साडेअकरा वाजता स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते.

प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे पालन करीत प्रवासी प्रवास करीत आहेत.

रेल्वे प्रवासात जात असताना योग्य ती काळजी घेत आहे. मागील काही दिवस रेल्वे बंद असल्याने खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने गैरसोय दूर झाली आहे.

-जाहिरोद्दीन सय्यद, व्यापारी

मुंबईला नेहमीच ये-जा असते. कोरोनामुळे काही दिवस रेल्वे बंद होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दरम्यान, अद्याप कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

-आनंद देशमुख, उस्मानाबाद