शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

नऊ महिन्यात ३०८ शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त; ९७०७ शेतकऱ्यांना लाभ

By गणेश कुलकर्णी | Updated: May 25, 2023 19:06 IST

शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ हा उपक्रम सुरु केला.

धाराशिव : प्रशासनाने सुरू केलेल्या ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ या उपक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून जिल्ह्यातील ३०८ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. याचा ९ हजार ७०७ शेतकऱ्यांना लाभ झाला.

कृषी विकासात शेतरस्त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ हा उपक्रम सुरु केला. या योजनेमध्ये गाव पातळीवरील शेतकरी, सरपंच, तंटामुक्ती समिती, मंडळ अधिकारी, बीट जमादार, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि कोतवाल यांच्या मार्फत अतिक्रमित शेतरस्ते मोकळे करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले होते. यामध्ये धाराशिव तालुक्यातील ७१, तुळजापुरातील ५७, उमरगा ३६, लोहारा २३, भूम ३५, परंडा २९, कळंब ३३ आणि वाशी तालुक्यातील २४ असे एकूण ३०८ शेतरस्ते ज्यांची एकूण लांबी ३३४.६१ किमी असून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त केल्यामुळे लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ७०७ आहे.

दरम्यान, अद्यापही काही प्रकरणात शेतरस्ता खुला करण्याबाबत आदेश पारित असतील परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही अथवा नव्याने शेतरस्ता पाहिजे असल्यास अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादroad safetyरस्ते सुरक्षा