शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात ३०८ शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त; ९७०७ शेतकऱ्यांना लाभ

By गणेश कुलकर्णी | Updated: May 25, 2023 19:06 IST

शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ हा उपक्रम सुरु केला.

धाराशिव : प्रशासनाने सुरू केलेल्या ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ या उपक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून जिल्ह्यातील ३०८ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. याचा ९ हजार ७०७ शेतकऱ्यांना लाभ झाला.

कृषी विकासात शेतरस्त्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शेतरस्त्यांची निकड लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जिल्ह्यामध्ये ‘शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ’ हा उपक्रम सुरु केला. या योजनेमध्ये गाव पातळीवरील शेतकरी, सरपंच, तंटामुक्ती समिती, मंडळ अधिकारी, बीट जमादार, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि कोतवाल यांच्या मार्फत अतिक्रमित शेतरस्ते मोकळे करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले होते. यामध्ये धाराशिव तालुक्यातील ७१, तुळजापुरातील ५७, उमरगा ३६, लोहारा २३, भूम ३५, परंडा २९, कळंब ३३ आणि वाशी तालुक्यातील २४ असे एकूण ३०८ शेतरस्ते ज्यांची एकूण लांबी ३३४.६१ किमी असून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त केल्यामुळे लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ७०७ आहे.

दरम्यान, अद्यापही काही प्रकरणात शेतरस्ता खुला करण्याबाबत आदेश पारित असतील परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही अथवा नव्याने शेतरस्ता पाहिजे असल्यास अशा शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादroad safetyरस्ते सुरक्षा