शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नादुरुस्त रस्त्यामुळे भूमकरांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST

भूम : शहरात अस्ताव्यस्त पार्किंग, रोडवर वाढलेले अतिक्रमण तसेच मोठ्या पावसामुळे खराब झालेले रस्ते, शहरवासीयांसाठी सध्या मोठी डोकेदुखी ठरत ...

भूम : शहरात अस्ताव्यस्त पार्किंग, रोडवर वाढलेले अतिक्रमण तसेच मोठ्या पावसामुळे खराब झालेले रस्ते, शहरवासीयांसाठी सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांचीदेखील मोठी गैरसोय होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

शहरात गोलाई चौक ते परंडा रोड, वाशी-कुंथलगिरी व पार्डी-उस्मानाबाद रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यावरदेखील जागोजागी खड्डे पडल्याचे चित्र आहे. गोलाई चौक ते परंडा रोडवर दुतर्फा मोठी नाली असून, मोठ्या पावसामुळे अनेकवेळा कचऱ्याने नाली तुंबली जाते. नाल्यातील वाळू रस्त्यावर आल्याने वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत. सध्या श्री संत तुकाराम चौकात खड्डे पडले असून, यात पाणी साचल्याने याचा त्रास विशेषत: दुचाकीचालकांना अधिक प्रमाणात सहन करावा लागत आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन या खड्ड्यात जाऊन आदळत आहे. तसेच गोलाई-उस्मानाबाद रोडवर महाविद्यालयानजीक उतारावर रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेले असून, येथे केवळ खडी शिल्लक राहिली आहे. तसेच मेनरोडवरदेखील पावसाने खड्डे पडल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

वाशीरोड हा नेहमीच खड्ड्याचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. सध्या पावसाने हा संपूर्ण रस्ता उखडला असून, रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून चिखल झाल्याने वाहन चालविताना ते स्लिप होत आहेत. या रस्त्याची अनेकदा दुरुस्ती केली जाते. परंतु, दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पुन्हा खराब होतो व पुन्हा रस्ते बुजविण्याचे सोपस्कार केले जातात. अनेकदा रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून जड वाहन गेल्यास नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. अशावेळी वाहनधारक व नागरिकांमध्ये तू-तू, मैं-मैं होते. यासाठी खराब झालेले रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी होत आहे.

चौकट

एकीकडे दुरवस्था, एकीकडे अतिक्रमण

शहरात गोलाई चौक ते परंडा रोडची एकीकडे दुरवस्था झालेली असता दुसऱ्या बाजूने अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्यालगत अस्ताव्यस्त वाहने लावली जात असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालतानादेखील मोठी कसरत करावी लागते. याच रोडवर भारतीय स्टेट बँक असून, या ठिकाणी सातत्याने वाहनांची वर्दळ असते. शिवाय, बँकेसमोरदेखील अस्ताव्यस्त पार्किंग दिसून येते.

कोट......

शहरातील मेन रोडवर अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांना अगोदर तोंडी समज दिली जाणार आहे. यानंतरही काही सुधारणा नाही झाल्यास नंतर मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी वाहने लावताना काळजी घ्यावी.

- दत्तात्रय सुरवसे, पोलीस निरिक्षक, भूम

भूम शहरात गोलाई चौक ते वाशी रोड, परंडा रोड, पार्डी रोड भागात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या पावसामुळे याच्या दुरुस्तीचे काम शक्य नाही. परंतु, पावसाची उघडीप मिळताच हे सर्व खड्डे भरून घेऊन वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करू.

- एच. सी. मुंडे, उपअभियंता, बांधकाम विभाग