शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

अल्प शिक्षणाचा अडथळा पार करीत लिहिली ५०० गाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

शब्दांचा जादूगार -गाणी, कवितेतून मांडल्या राेजच्या जगण्यातील वेदना दयानंद काळुंके अणदूर - तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी हे छाेटंसं गाव. प्रदीप ...

शब्दांचा जादूगार -गाणी, कवितेतून मांडल्या राेजच्या जगण्यातील वेदना

दयानंद काळुंके

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी हे छाेटंसं गाव. प्रदीप मुरलीधर पाटील याच गावात लहानाचे माेठे झाले. घरच्या परिस्थितीमुळे सहावीच्या वर्गातच शिक्षण सुटले. मात्र, त्यांना लहानपणापासूच कविता करणे, गाण्यांची आवड हाेती. ‘आवड असली की सवड मिळते’ असे म्हणतात ना. त्याप्रमाणे अल्प शिक्षणाचा अडथळा पार करून आजवर त्यांनी तब्बल ५ हजारांहून अधिक गाणी रचली आहेत. यातील अनेक गाण्यांना नामवंत गायकांनी चाल दिली आहे. मध्यंतरी शेतकरी आत्महत्येचे लाेण जिल्ह्यात वाढत असताना त्यांचे ‘‘बळीराजा तू का भिकारी....’’ हे गाणे आले हाेते. या गाण्याने प्रचंड वाहवा मिळविली. त्यांचे गाण्यांचे कार्यक्रमही नेहमी हाेत हाेते; परंतु काेराेनाने मागील दीड वर्षापासून हे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदीप पाटील यांनी जेमतेम सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे शाळेला रामराम ठाेकला. लहानपणापासूनच त्यांना गाणी म्हणण्यासाेबतच लिहिण्याची आवड निर्माण झाली. कवी अथवा गीतकार हाेण्यासाठी फार माेठं शिक्षण लागतं, हे त्यांनी कुठेतरी ऐकलं हाेतं. त्यामुळे काहीकाळ ते कविता, गाण्यांपासून दूर गेले. उपजीविकेसाठी इजलकरंजी येथे स्टाेअर किपर म्हणून काम करू लागले. या ठिकाणी राेजच्या जगण्याच्या अनुभवातून त्यांनी कविता, गाणी लिहायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते एकामागून एक कविता, गीतांची रचना करू लागले. पाहता-पाहता ते शिघ्रकवी म्हणून नावारूपाला आले. साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे, कवी बहिणाबाई चौधरी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून याच क्षेत्रात नाव कमावण्याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली. १९८३ पासून ते आजतागायत प्रदीप पाटील यांनी भक्तिगीते, भावगीते, भारूड, गवळण, पोवाडे, गोंधळी गीते, गजल, लावणी, चित्रपट गीते, नाट्य गीते, समाज प्रबोधन गीते, पाळणा गीते, विवाह गीते, शेतकरी गीते, कथा-कादंबरी, वात्रटिकांच्या माध्यमातून राेजच्या जगण्यातील वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. आजवर त्यांनी सुमारे ५००० गाणी लिहून पूर्ण केली आहेत. नुकतेच त्यांच्या ‘‘गाणी रानवना’’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनही झाले आहे. मराठी चित्रपट ‘कांगावा’, लघुपट ‘बोंब’, ‘सांग ना देवी माझ्या भावाला’, ‘आंबेचा चौघडा’, ‘परडीवाला नवरा पाहिजे’, ‘महिमा मसाेबाचा’, ‘काशा रे काशा कशाला मिस कॉल करतोस’, ‘ललकारी लोकगीतांची’ असे अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. राज्यातील नामवंत गायक विठ्ठल उमप, निशा भगत, शकुंतला जाधव, भारती मडवी, नंदू कदम, विकास कसबे आदींनी त्यांची गाणी गायली आहेत. कमलेश जाधव, बाळू देडे, मधू रेडकर यांनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. गाणी लिखाणात त्यांनी माेठी उंची गाठली असली तरी जिल्ह्यात आजही ते शिघ्रकवी म्हणूनच परिचित आहेत. पाटील हे समाज प्रबाेधनपर कार्यक्रम करतात. या माध्यमातून त्यांची उपजीविका चालत हाेती; परंतु लाॅकडाऊनमुळे हे प्राेग्रॅम बंद पडले आहेत. परिणामी सध्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चाैकट...

दाेनशेवर सन्मानपत्रे

बसवंतवाडीसारख्या एका लहानशा खेड्यात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला शेतकऱ्याचा मुलगा प्रदीप पाटील याने आज साहित्य क्षितिजावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. जिल्ह्यातील शिघ्रकवी म्हणून त्यांची ओळख आहे. आजवर त्यांना सुमारे दाेनशेवर सन्मानपत्रे मिळाली आहेत.

जनजागृतीपर कार्यक्रम...

साहित्य क्षेत्रातील दादासाहेब लोणकर, शिरीष शिंदे, शिवाजी तापकीर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, ना. धों. महानोर, इंद्रजित भालेराव, गो. मा. पवार, अरुण यादव, भिला ठाकरे आदी साहित्यिकांचा त्यांना सहवास लाभलेला आहे. प्रदीप पाटील यांनी आजवर शासनाकडून राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रमांमध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती, समाजप्रबाेधनाचे काम केले आहे.

‘त्या’ गाण्याने मिळविली वाहवा

मध्यंतरी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले हाेते. शेतकऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययाेजना करण्यात येत हाेत्या. याच काळात पाटील यांनी कलापथकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर जनजागृतीचे काम केले हाेते. मंत्रिमंडळासमाेरही त्यांनी गीतांचे सादरीकरण केले हाेते. ‘‘बळीराजा तू का भिकारी....’’ हे त्यांचे गीत प्रचंड गाजले हाेते.