शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

मी ऊस जाळला नाही; घ्या हनुमानाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 06:39 IST

एकीकडे गुन्हेगार, आरोपी शोधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासत कल्पनेपलीकडील उठाठेवी केल्या जातात.

अणदूर (जि. उस्मानाबाद) : एकीकडे गुन्हेगार, आरोपी शोधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासत कल्पनेपलीकडील उठाठेवी केल्या जातात. हिप्परगा ताड गावातील ग्रामस्थाचा ऊस अज्ञाताने जाळला आहे. त्याचा आरोपी शोधण्यासाठी गावातील काही लोकांनी हनुमानाची शपथ घेऊन पायरी बडविण्याची उठाठेव केली.तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा (ताड) येथील शेतकरी बसवेश्वर गुरुनाथ बचाटे यांचा दोन एकर ऊस अज्ञाताने दहा दिवसांपूर्वी जाळला गेला होता. त्यातून त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबद्दलची तक्रार इटकळ आऊटपोस्टला केली गेली आहे. मात्र, अद्याप आरोपीचा सुगावा लागलेला नाही. यावरून अनेकांकडे संशयाने पाहिले जात होते. ही ब्याद संपुष्टात आणण्यासाठी गावातील काही लोकांनी एकत्र येत एक समिती स्थापन केली. या समितीने गावातील नागरिकांनी ग्रामदैवत हनुमानाची शपथ घेऊन मंदिराची पायरी बडवावी, असा निर्णय घेतला. अर्थात जो शपथ घेणार नाही, तो संशयित असेल, असा निष्कर्ष काढून त्यांची नावे पोलिसांना कळविण्यात येणार असल्याचीही चर्चा उठली. त्यामुळे शनिवारी गावातील दीडशेवर नागरिकांनी ‘आम्ही ऊस पेटवला नाही’ असे म्हणून हनुमानाची शपथ घेतली व मंदिराची पायरी बडवत यातून सुटका करून घेतली.  या प्रकारातून महिला, बालके व वृद्धांना वगळण्यात आले होते. सकाळपासून मंदिरासमोर पायरी बडविण्यासाठी गर्दी झालेली होती. एकूणच या प्रकाराने आरोपीचा सुगावा लागला नसला तरी गावातील काही लोकांची ही तपासकामाची पद्धत चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद