शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तासाभरातच हुकली सौरपंपाच्या नोंदणीची ‘लिंक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

कळंब : गत अनेक महिन्यांपासून बंद असलेली सौरपंप योजनेच्या नोंदणीची ऑनलाईन ‘लिंक’ मंगळवारी खुली झाली खरी परंतु, अवघ्या एक ...

कळंब : गत अनेक महिन्यांपासून बंद असलेली सौरपंप योजनेच्या नोंदणीची ऑनलाईन ‘लिंक’ मंगळवारी खुली झाली खरी परंतु, अवघ्या एक तासातच ती पुन्हा ‘कोमात’ गेली. यामुळे केवळ ‘झलक’ दाखवून गायब झालेल्या या लिंकमुळे असंख्य इच्छुक शेतकऱ्यांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला.

सुरळीत वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महाअभियान अर्थात पीएम किसान ही योजना राबविण्यास सुरुवात केली. यानुसार शेतकऱ्यांना तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे सौरपंप उपलब्ध करून देण्यात येऊ लागले. यासाठी शेतकऱ्यांना नाममात्र पाच ते दहा टक्के आपला हिस्सा द्यावा लागत असे. यापूर्वी महावितरण कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबवली जात होती. मात्र, मागच्या दीड वर्षात यासाठी केली जाणारी नोंदणी ठप्प असल्याने अनेक इच्छुक शेतकरी या योजनेपासून दूर राहिले होते. वारंवार यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे का? हे पडताळण्यासाठी सेवा केंद्राकडे हेलपाटे मारत होते. विशेषतः खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना तर मोठी प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरणाच्या माध्यमातून राज्यात ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ असे गोंडस नाव धारण करत मंगळवारी कृषी पंपांना सौरशक्ती पुरवण्यासाठी नोंदणी करता यावी याकरिता लिंक उपलब्ध करून दिली. यामुळे मागच्या वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठी धावपळ करून कागदपत्राची धावपळ केली. मात्र, लिंक पुढं न चालल्याने शेतकऱ्यांची धावपळ व्यर्थ ठरली.

चौकट...

रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचे प्रयत्न

महावितरणच्या पोर्टल तसेच महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरण अर्थात महाउर्जाने सौरपंप नोंदणीसाठी ‘कुसुम’ ची लिंक उपलब्ध करून दिली. याची शेतकऱ्यांना माहिती होताच अवघ्या एक तासाभरात ही सेवा ‘जाम’ झाली. यानंतर पुढे नाव अन् गट क्रमांकाच्या पुढे कोणतीच प्रक्रिया होत नव्हती. यानंतर तर काहीच प्रोसेस होत नव्हती. एकूणच अवघ्या एक तासाभरात प्रणाली बंद झाल्यात जमा होती. यामुळे झलक दाखवून गायब झालेल्या त्या लिंकला कनेक्ट होण्यासाठी, त्याठिकाणी आपले नाव नोंदणीसाठी शेतकरी रात्री उशिरापर्यंत आटापिटा करत होते.