शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याला मातीमोल भाव, फळांचे दरात मात्र होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:21 IST

भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच ...

भाजीपाल्यांच्या दरात होणारा चढाव-उतार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती घसरलेल्याच आहेत. सध्या फळभाज्यांचे दर कमीच आहेत. पत्ताकोबी, फ्लावर १० रुपये, टोमॅटो १० ते १५ रुपये, वांगी, भेंडी, शिमला मिरची ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाट्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. बटाटा १० ते १५ रुपये किलो, कारले, दोडका ४० रुपये, गवार ५०, शेवगा ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. भाज्यांचे दर उतरत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे फळांच्या किमतीत प्रतिदिन वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

खाद्यतेलाचे दर चढेच

खाद्यतेलाचे दरात प्रतिदिन वाढ होत आहे. सोयाबीन तेल १२३ रुपये, पामतेल १२० रुपये किलो, शेंगदाणा १५० ते १६० रुपये, मोहरी तेल १३५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. तूर डाळ ९६ रुपये, हरभरा डाळ ५६, मूग ९० रुपये, उडीद ९०, मसूर डाळ ६५ रुपये किलोने विक्री होत आहे. साखरेचा दर स्थिर असून, साखर ३२ रुपये किलोने विक्री होती.

पालेभाज्या स्वस्तच

बाजारात मागील तीन महिन्यापासून पालेभाज्यांच्या किमती उतरलेल्याच आहेत. शेपू १० रुपये जुडी, कोथिंबीर, मेथी, चुका, पालकाची जुडी ५ रुपयास जुडी विक्री होत आहे. गाजराची आवक अधिक असल्याने गाजर १० ते १५ रुपये किलोने विक्रीस उपलब्ध आहेत.

रामफळ ८० रुपये किलो

बाजारपेठेत सफरचंद १२० ते १६० रुपये किलो, रामफळ ८०, मोसंबी १००, संत्रा ६०, द्राक्ष ६० ते ८० रुपये, चिकू ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे.

भाजीपाला वगळता खाद्यतेल व इतर किराणा सामानाचे दरात वाढ होत आहे. फळांचे दर वाढतच आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. सचिन लोखंडे, ग्राहक

मागील महिन्यात तूर डाळ ८५ रुपये किलो होती. गेल्या आठवड्यात तूर डाळ १०२ वर किलोने विक्री होत आहे. या आठवड्यात तूर डाळीचा दर ९६ रुपये किलो इतका आहे. खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत.

अमित भराटे, किराणा व्यावसायिक

बाजारात फळांची आवक वाढली आहे. थंडीमुळे रसदार फळांना मागणी कमी आहे. मात्र, फळांचे दर वाढलेले आहेत. उन्ह वाढल्यानंतर फळांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

अमोल पेठे, फळविक्रेते