शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

...'येथे' भाविकांच्या भेटीसाठी विठ्ठलाची दिंडी जाते थेट स्मशानभूमीत; साडेसातशे वर्षांची आहे परंपरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:08 IST

साडेसातशे वर्षांपूर्वी गावात लोकदेवता विठ्ठलाचा दिंडी सोहळा सुरू करणाऱ्या  भाविकांना भेटण्यासाठी चक्क विठ्ठलाची दिंडीच स्मशानभूमीत जाते.

ठळक मुद्देअख्खा गाव स्मशानभूमीत विठ्ठलाच्या दिंडीसह उभा होतो आणि आपल्या पूर्वजांना टाळ-मृदंगाच्या गजरात अभिवादन करतो.भाविकांच्या भेटीसाठी स्मशानभूमीत जाणारी विठ्ठल दिंडी ही अनोखी प्रथा मागील सुमारे सहाशे वर्षांपासून सुरू आहे.

उस्मानाबाद : साडेसातशे वर्षांपूर्वी गावात लोकदेवता विठ्ठलाचा दिंडी सोहळा सुरू करणाऱ्या  भाविकांना भेटण्यासाठी चक्क विठ्ठलाची दिंडीच स्मशानभूमीत जाते. अख्खा गाव स्मशानभूमीत विठ्ठलाच्या दिंडीसह उभा होतो आणि आपल्या पूर्वजांना टाळ-मृदंगाच्या गजरात अभिवादन करतो. भाविकांच्या भेटीसाठी स्मशानभूमीत जाणारी विठ्ठल दिंडी ही अनोखी प्रथा मागील सुमारे सहाशे वर्षांपासून आळणी या गावात सुरू आहे. या अनोख्या प्रथेबरोबरच चंद्रभागाबाई देवी हे नदीच्या नावाने मंदीर अनेकांच्या कौतूकास पात्र ठरत आहे. 

उस्मानाबाद शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आळणी गावात शुक्रवारी वारकऱ्यांचा मेळा जमला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीकडे धाव घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र आळणी गावात साक्षात विठ्ठलच आपल्या भाविकांना भेटण्यासाठी स्मशानभूमीत जातो. विशेष म्हणजे या दिंडीत हिंदू, मुस्लिम यांच्यासह गावातील अठरापगड जातीचे भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.  स्मशानभूमी म्हणजे अंत्यविधीखेरीज त्या ठिकाणी जाण्याचे दुसरे प्रयोजन नाही. या सर्व बाबींना छेद देत गावातील एकोपा निर्माण करण्यास कारणीभूत असलेला दिंडी सोहळा ज्या पूर्वजांनी सुरू केला, त्यांना विठ्ठलाचे दर्शन घडवून आणण्याची ही अनोखी प्रथा राज्यात बहुदा केवळ आळणी येथेच सुरू असावी.

दिंडीसाठी मुली येतात माहेरी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातून निघालेला हा दिंडी सोहळा गावाला वळसा घालून स्मशानभूमीत गेला. तेथे अभिवादन करून पुन्हा गावाच्या हमरस्त्यावरून मंदिरात येवून आरतीने दिंडीने समारोप करण्यात आला. एकवेळ दिवाळीला माहेरवासीन गावाकडे येणार नाही. मात्र या दिंडीकडे हमखास मुली माहेरी येतात, अशा शब्दात बाळासाहेब वीर यांनी महती विशद केली. 'विठू माझा लेकुरवाळा' हा जीवंत देखावा सादर करणारे बाळासाहेब वीर आपल्या या अभिमानास्पद वारशाबद्दल न थकता बोलतात. 

बंधुभाव आणि समानतेचे प्रतिक गावातील दिंडी सोहळ्यातील मानकरी तांबेबुवा महाराज यांनी गोरोबाकाका आणि विठ्ठल या दोन्ही वाऱ्यांची गावात असलेली परंपरा सांगितली. टाळ-मृदंग आणि पखवाजाच्या आवाजात सुरू असलेल्या दिंडी सोहळ्यात आपल्या चार वर्षाच्या नातवाला सोबत घेवून हमरोद्दीन मुजावर साखर आणि पेढे वाटत होते. वारकरी सांप्रदायाला अपेक्षित असलेला बंधुभाव आणि समानता हे या दिंडी सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गावातील हरिनाम सप्ताह दरवर्षी मुस्लिम बांधव स्व:खर्चाने पंगत घालत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीSocialसामाजिक