शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

...'येथे' भाविकांच्या भेटीसाठी विठ्ठलाची दिंडी जाते थेट स्मशानभूमीत; साडेसातशे वर्षांची आहे परंपरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:08 IST

साडेसातशे वर्षांपूर्वी गावात लोकदेवता विठ्ठलाचा दिंडी सोहळा सुरू करणाऱ्या  भाविकांना भेटण्यासाठी चक्क विठ्ठलाची दिंडीच स्मशानभूमीत जाते.

ठळक मुद्देअख्खा गाव स्मशानभूमीत विठ्ठलाच्या दिंडीसह उभा होतो आणि आपल्या पूर्वजांना टाळ-मृदंगाच्या गजरात अभिवादन करतो.भाविकांच्या भेटीसाठी स्मशानभूमीत जाणारी विठ्ठल दिंडी ही अनोखी प्रथा मागील सुमारे सहाशे वर्षांपासून सुरू आहे.

उस्मानाबाद : साडेसातशे वर्षांपूर्वी गावात लोकदेवता विठ्ठलाचा दिंडी सोहळा सुरू करणाऱ्या  भाविकांना भेटण्यासाठी चक्क विठ्ठलाची दिंडीच स्मशानभूमीत जाते. अख्खा गाव स्मशानभूमीत विठ्ठलाच्या दिंडीसह उभा होतो आणि आपल्या पूर्वजांना टाळ-मृदंगाच्या गजरात अभिवादन करतो. भाविकांच्या भेटीसाठी स्मशानभूमीत जाणारी विठ्ठल दिंडी ही अनोखी प्रथा मागील सुमारे सहाशे वर्षांपासून आळणी या गावात सुरू आहे. या अनोख्या प्रथेबरोबरच चंद्रभागाबाई देवी हे नदीच्या नावाने मंदीर अनेकांच्या कौतूकास पात्र ठरत आहे. 

उस्मानाबाद शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आळणी गावात शुक्रवारी वारकऱ्यांचा मेळा जमला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीकडे धाव घेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र आळणी गावात साक्षात विठ्ठलच आपल्या भाविकांना भेटण्यासाठी स्मशानभूमीत जातो. विशेष म्हणजे या दिंडीत हिंदू, मुस्लिम यांच्यासह गावातील अठरापगड जातीचे भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.  स्मशानभूमी म्हणजे अंत्यविधीखेरीज त्या ठिकाणी जाण्याचे दुसरे प्रयोजन नाही. या सर्व बाबींना छेद देत गावातील एकोपा निर्माण करण्यास कारणीभूत असलेला दिंडी सोहळा ज्या पूर्वजांनी सुरू केला, त्यांना विठ्ठलाचे दर्शन घडवून आणण्याची ही अनोखी प्रथा राज्यात बहुदा केवळ आळणी येथेच सुरू असावी.

दिंडीसाठी मुली येतात माहेरी आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातून निघालेला हा दिंडी सोहळा गावाला वळसा घालून स्मशानभूमीत गेला. तेथे अभिवादन करून पुन्हा गावाच्या हमरस्त्यावरून मंदिरात येवून आरतीने दिंडीने समारोप करण्यात आला. एकवेळ दिवाळीला माहेरवासीन गावाकडे येणार नाही. मात्र या दिंडीकडे हमखास मुली माहेरी येतात, अशा शब्दात बाळासाहेब वीर यांनी महती विशद केली. 'विठू माझा लेकुरवाळा' हा जीवंत देखावा सादर करणारे बाळासाहेब वीर आपल्या या अभिमानास्पद वारशाबद्दल न थकता बोलतात. 

बंधुभाव आणि समानतेचे प्रतिक गावातील दिंडी सोहळ्यातील मानकरी तांबेबुवा महाराज यांनी गोरोबाकाका आणि विठ्ठल या दोन्ही वाऱ्यांची गावात असलेली परंपरा सांगितली. टाळ-मृदंग आणि पखवाजाच्या आवाजात सुरू असलेल्या दिंडी सोहळ्यात आपल्या चार वर्षाच्या नातवाला सोबत घेवून हमरोद्दीन मुजावर साखर आणि पेढे वाटत होते. वारकरी सांप्रदायाला अपेक्षित असलेला बंधुभाव आणि समानता हे या दिंडी सोहळ्याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गावातील हरिनाम सप्ताह दरवर्षी मुस्लिम बांधव स्व:खर्चाने पंगत घालत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीSocialसामाजिक