शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ मंडलांना अतिवृष्टीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्री जिल्ह्यातील जवळपास बारा मंडलांना अतिवृष्टीने तडाखा दिला. पावसासाेबतच वादळीवारे असल्याने ताेडणीसाठी आलेला ...

उस्मानाबाद : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्री जिल्ह्यातील जवळपास बारा मंडलांना अतिवृष्टीने तडाखा दिला. पावसासाेबतच वादळीवारे असल्याने ताेडणीसाठी आलेला ऊस आडवा झाला, तर काढणीला आलेला व काढणी झालेल्या मूग पाण्याखाली गेला आहे. परंडा तालुक्यातील सर्व पाच, तर भूम तालुक्यातील पाचपैकी चार मंडलात अतिवृष्टी नाेंदविली गेली.

पावसाळ्याचे तीन महिने सरून गेले तरी वार्षिक सरासरीच्या ५० ते ५५ टक्के पाऊस पडला हाेता. त्यामुळे बहुतांश प्रकल्प माेठ्या पावसाच्या प्रतीक्षेत हाेते. आठ ते दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. यानंतर चार ते पाच दिवसांचा खंड दिल्यानंतर शनिवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात जाेरदार पाऊस काेसळला. परंडा तालुक्यातील सर्वच पाचही मंडलात अतिवृष्टी नाेंदविली गेली. यामध्ये परंडा मंडलात १०७.३ मिलिमीटर, आसू ८४.५ मिमी., जवळा ९४.३, अनाळा ८५.५, साेनारी ९१.३ मिमी. पाऊस काेसळला. भूम तालुक्यातील अंबी १०२.८ मिमी., माणकेश्वर ११६.३ मिमी., भूम ९४.३, ईट ८१.५, तर वालवड मंडलात ६२.८ मिमी. पाऊस नाेंदविला गेला. वाशी तालुक्यातील पारगाव ७८.५ मिमी. तर तेरखेडा सर्कलमध्ये ६५.३ मिमी. पाऊस नाेंदविला गेला. तसेच तुळाजपूर तालुक्यातील मंगरूळ सर्कलमध्येही ७७.३ मिमी. पावसाची नाेंद झाली आहे. हा पाऊस साेयाबीन पिकासाठी तसेच प्रकल्पांचा जलसाठा उंचावण्यासाठी उपयुक्त असला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे माेडणारा ठरला आहे. वादळी वाऱ्यामुळे ऊस अक्षरश: आडवा झाला, तर काढणीला आलेला उडीद, मूग ही पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याची गरज शेतकरी बाेलून दाखवत आहेत.