शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक, व्यापाऱ्यांत पसरली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST

वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या ...

वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनेने बुधवारी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

शहरामध्ये मागील एक वर्षाहून अधिक कालावधीपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. ज्यामध्ये घरफोडी करून शस्त्राने नागरिकांना जखमी करण्याबरोबरच मुख्य बाजारपेठेमधील व्यावसायिकांची दुकाने फोडली जात आहेत. यातच मागील वर्षभरात एकाही घटनेचा तपास लागलेला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. रविवारीदेखील मुख्य बाजारपेठेचा हिस्सा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किराणा दुकान फोडून हजारो रुपयांचे खाद्यतेल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे नगरपंचायतीने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून रस्त्यावरील तसेच नागरी वस्त्यांमधील सातत्याने बंद राहत असलेले पथदिवे तत्काळ बदलून ते कायम चालू राहतील अशी व्यवस्था करावी. शहरातील मुख्य रस्ते, चोररस्ते, मुख्य बाजारपेठ चौक या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

वाशी हे तालुक्याचे ठिकाण असूनदेखील शहरात येण्यासाठी एकही रस्ता सुस्थितीत नाही. यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दळणवळण होऊ शकत नाही. शिवाय, एस.टी.सारखी शासकीय वाहनेदेखील शहरात येण्याचे टाळतात. त्यामुळे आपल्या अधिकारातून सर्व रस्तेदुरुस्ती करावी, अशी मागणी नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागील घटनांचा तपास लावून भविष्यातील घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व नगरपंचायतीच्या वतीने अधीक्षक गोपीनाथ घुले यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी वाशी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, उपाध्यक्ष सूर्यकांत मोळवणे, सचिव ॲड. प्रवीण पवार, व्यापारी बंडू भाळवणे, आदी उपस्थित होते. निवेदनावर खालेक पटवेकर, बाळासाहेब उंदरे, शिवशंकर चौधरी, सुंदर नन्नवरे, अशोक टेकाळे, सतीश जगताप, रमेश वीर, गुरुलिंग नगरे, शिवशंकर होळकर, राजेंद्र शेटे, अमित येवारे, अभिमान माने, मनीष कोळी यांच्यासह शहरातील व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.