शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
2
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
3
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
4
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
5
'या' वस्तूंवर GST कपातीची शक्यता; जीएसटी काऊन्सिल करू शकते घोषणा, कोणते आहेत प्रोडक्ट?
6
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
7
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
8
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
9
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
10
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
11
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
12
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
13
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
14
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
15
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
17
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
18
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
19
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
20
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक, व्यापाऱ्यांत पसरली दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST

वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या ...

वाशी : शहरासह तालुक्यात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या चोऱ्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनेने बुधवारी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

शहरामध्ये मागील एक वर्षाहून अधिक कालावधीपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. ज्यामध्ये घरफोडी करून शस्त्राने नागरिकांना जखमी करण्याबरोबरच मुख्य बाजारपेठेमधील व्यावसायिकांची दुकाने फोडली जात आहेत. यातच मागील वर्षभरात एकाही घटनेचा तपास लागलेला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. रविवारीदेखील मुख्य बाजारपेठेचा हिस्सा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किराणा दुकान फोडून हजारो रुपयांचे खाद्यतेल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे नगरपंचायतीने शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून रस्त्यावरील तसेच नागरी वस्त्यांमधील सातत्याने बंद राहत असलेले पथदिवे तत्काळ बदलून ते कायम चालू राहतील अशी व्यवस्था करावी. शहरातील मुख्य रस्ते, चोररस्ते, मुख्य बाजारपेठ चौक या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

वाशी हे तालुक्याचे ठिकाण असूनदेखील शहरात येण्यासाठी एकही रस्ता सुस्थितीत नाही. यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दळणवळण होऊ शकत नाही. शिवाय, एस.टी.सारखी शासकीय वाहनेदेखील शहरात येण्याचे टाळतात. त्यामुळे आपल्या अधिकारातून सर्व रस्तेदुरुस्ती करावी, अशी मागणी नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागील घटनांचा तपास लावून भविष्यातील घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व नगरपंचायतीच्या वतीने अधीक्षक गोपीनाथ घुले यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी वाशी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, उपाध्यक्ष सूर्यकांत मोळवणे, सचिव ॲड. प्रवीण पवार, व्यापारी बंडू भाळवणे, आदी उपस्थित होते. निवेदनावर खालेक पटवेकर, बाळासाहेब उंदरे, शिवशंकर चौधरी, सुंदर नन्नवरे, अशोक टेकाळे, सतीश जगताप, रमेश वीर, गुरुलिंग नगरे, शिवशंकर होळकर, राजेंद्र शेटे, अमित येवारे, अभिमान माने, मनीष कोळी यांच्यासह शहरातील व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.