शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

जबरदस्त ! ४० गुंठ्यात सिमला मिरचीतून १५ दिवसांत दीड लाख उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 18:51 IST

शेती व्यावसायात पीक नियोजन योग्य प्रकारे केल्यास नगदी उत्पादन पदरात मिळते

ठळक मुद्दे५५ दिवसानंतर मिरचीच्या रोपांना फळधारणेस सुरुवात झाली.चाळीस गुंठे क्षेत्रात ४ टन सिमला मिरचीचे उत्पादन निघाले. 

तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : माळरान जमिनीवर ४० गुंठे क्षेत्रात सिमला मिरचीचे १५ दिवसात चार टन उत्पादन घेत पंधरा दिवसांत तब्बल दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाडून घेण्याची किमया तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथील शेतकऱ्याने साधली आहे.

धनाजी कदम यांची पिंपळा (खुर्द) शिवाराठत माळरान जमीन असून ऑगष्ट महिन्यात ४० गुंठे जमिनीत मलचिंग पेपर अंथरूण ठिबक सिंचनाचा वापर करीत त्यांनी १० हजार रोपाची लागवड केली. उत्तम पीक नियोजन करून मिरची लागवडीसह किकटनाशक, फवारणी, खत यासाठी त्यांनी दोन लाख रुपयाचा खर्च केला. ५५ दिवसानंतर मिरचीच्या रोपांना फळधारणेस सुरुवात झाली. चार तोडणीमध्ये त्यांना या चाळीस गुंठे क्षेत्रात ४ टन सिमला मिरचीचे उत्पादन निघाले. 

माळरानावर उत्पादीत केलेली मिरची नागपूर बाजारपेठेत विक्रीस व्यापाऱ्यामार्फत पाठविण्यात आली असून, तेथे मिरचीस प्रति किलो ४९ ते ५१ रूपये प्रति किलो भाव मिळाला. धनाजी कदम यानी बांधावरच व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री केली केली असून, यातून १५ दिवसात तब्बल दीड लाख रूपये शेतकऱ्याच्या पदरात पडले.कोराेना काळात बाजारपेठा बंद होत्या. मात्र, आता बाजारपेठा सुरळीत चालू झाल्याने भाजीपाल्याला चांगला भाव मिळू लागला आहे. शेती व्यावसायात पीक नियोजन योग्य प्रकारे केल्यास नगदी उत्पादन पदरात मिळते हे धनाजी कदम यांनी सिध्द करून दाखविले आहे.

चार वर्षापूर्वी सोलापूर शहरालगत असलेल्या हिप्परगा तलावातून टिपरने माळरान जमिनीत गाळ भरून सुपीकता आणली. ऑगस्ट महिन्यात येथे सिमला मिरची लागवड केली. पिकाला पाण्याचा वापर ठिबकने करून पाण्याची बचत केली. यासाठी भाऊ तायाप्पा, भावजय रेखा, पत्नी मुक्ताबाई यांची साथ मिळाली. त्यामुळे १५ दिवसात दीड लाखाचे उपादन पदरात पडले.- धनाजी कदम, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद