शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

जबरदस्त ! ४० गुंठ्यात सिमला मिरचीतून १५ दिवसांत दीड लाख उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 18:51 IST

शेती व्यावसायात पीक नियोजन योग्य प्रकारे केल्यास नगदी उत्पादन पदरात मिळते

ठळक मुद्दे५५ दिवसानंतर मिरचीच्या रोपांना फळधारणेस सुरुवात झाली.चाळीस गुंठे क्षेत्रात ४ टन सिमला मिरचीचे उत्पादन निघाले. 

तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : माळरान जमिनीवर ४० गुंठे क्षेत्रात सिमला मिरचीचे १५ दिवसात चार टन उत्पादन घेत पंधरा दिवसांत तब्बल दीड लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पाडून घेण्याची किमया तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथील शेतकऱ्याने साधली आहे.

धनाजी कदम यांची पिंपळा (खुर्द) शिवाराठत माळरान जमीन असून ऑगष्ट महिन्यात ४० गुंठे जमिनीत मलचिंग पेपर अंथरूण ठिबक सिंचनाचा वापर करीत त्यांनी १० हजार रोपाची लागवड केली. उत्तम पीक नियोजन करून मिरची लागवडीसह किकटनाशक, फवारणी, खत यासाठी त्यांनी दोन लाख रुपयाचा खर्च केला. ५५ दिवसानंतर मिरचीच्या रोपांना फळधारणेस सुरुवात झाली. चार तोडणीमध्ये त्यांना या चाळीस गुंठे क्षेत्रात ४ टन सिमला मिरचीचे उत्पादन निघाले. 

माळरानावर उत्पादीत केलेली मिरची नागपूर बाजारपेठेत विक्रीस व्यापाऱ्यामार्फत पाठविण्यात आली असून, तेथे मिरचीस प्रति किलो ४९ ते ५१ रूपये प्रति किलो भाव मिळाला. धनाजी कदम यानी बांधावरच व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री केली केली असून, यातून १५ दिवसात तब्बल दीड लाख रूपये शेतकऱ्याच्या पदरात पडले.कोराेना काळात बाजारपेठा बंद होत्या. मात्र, आता बाजारपेठा सुरळीत चालू झाल्याने भाजीपाल्याला चांगला भाव मिळू लागला आहे. शेती व्यावसायात पीक नियोजन योग्य प्रकारे केल्यास नगदी उत्पादन पदरात मिळते हे धनाजी कदम यांनी सिध्द करून दाखविले आहे.

चार वर्षापूर्वी सोलापूर शहरालगत असलेल्या हिप्परगा तलावातून टिपरने माळरान जमिनीत गाळ भरून सुपीकता आणली. ऑगस्ट महिन्यात येथे सिमला मिरची लागवड केली. पिकाला पाण्याचा वापर ठिबकने करून पाण्याची बचत केली. यासाठी भाऊ तायाप्पा, भावजय रेखा, पत्नी मुक्ताबाई यांची साथ मिळाली. त्यामुळे १५ दिवसात दीड लाखाचे उपादन पदरात पडले.- धनाजी कदम, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद