शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ग्रामपंचायती, कक्ष बंद ठेवणे भोवले; ग्रामसेवकांसह शिक्षकांना नोटीस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 20:20 IST

ग्रामीण भागात शहरातील नागरिक परातल्याने गर्दी

ठळक मुद्देगटविकास अधिका-यांकडून कार्यवाही

ईट (जि. उस्मानाबाद) : कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असतानाही अनेक ग्रामपंचायती गंभीर नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आणला होता. सदरील बाब भूम पंचायत समितीचे गटविकास अधिका-यांनी गांभीर्याने घेत संबंधित ग्रामसेवकांसह शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस २८ मार्च रोजी बजावली आहे. २४ तासांच्या आत प्रत्यक्ष हजार राहून खुलासा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्येही कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. दिवसागणिक बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वी मोठ्या शहरांतील असंख्य लोक आपल्या मूळ गावी परतले आहेत. अक्षरश: गावेची गावे गर्दीने फुलून गेली आहेत. दरम्यान, अशा लोकांची नोंदणी करण्यासोबतच अन्य मदतीसाठी ग्रामपंचायत स्तरावर कोरोना सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले होते. हे कक्ष २४ तास सुरू ठेवण्याबाबत आदेशात नमूद आहे.

त्यानुसार बहुतांश ग्रामपंचायतींनी कक्ष स्थापन करून कामकाज सुरू केले आहे. अनेक ग्रामपंचायतीतील सहाय्यता कक्ष अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत. याचा फायदा संबंधित गावांतील लोकांना होत आहे. असे असतानाच दुसरीकडे काही ग्रामपंचायती कोरोनाच्या संसर्गाबाबत फारशा गंभीर नसल्याचे ‘लोकमत’ने २७ मार्च रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले होते. भूम तालुक्यातील पखरूड येथील ग्रामपंचायत व तेथील कक्षही कुलूप बंद होता. अशा काळात गावातील आरोग्य उपकेंद्र सुरू असणे गरजेचे होते. परंतु, तेही बंदच दिसून आले. लांजेश्वर या गावात बाहेरून शंभर ते दीडशे लोक आले आहेत. परंतु, त्यांची नोंद घेतलेली नाही. एवढेच नाही तर सहाय्यता कक्षही कुलूपबंद होता. आंद्रुड गावातही काही वेगळी स्थिती नव्हती. घाटनांदूर आणि नागेवाडी ग्रामपंचायतींची कार्यालये कुलूपबंद होती.

यापैकी काही ग्रामपंचायतींना नायब तहसीलदार यांनी भेट दिली होती. त्यांच्याही तपासणीत विदारक वास्तव समोर आले. ही बाब गांभीर्याने घेत संधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच नियुक्ती केलेल्या शिक्षकांना गटविकास अधिकाºयांनी २८ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत समक्ष उपस्थित राहून नोटिसेचा खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास वा समाधानकारक नसल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे नोटिसेत म्हटले आहे.यांना बजावली नोटीसपखरूड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सी. आर. मोटे, आंद्रुड जिल्हा परिषद शाळेवरील सहशिक्षक बालाजी नवनाथ पवार, घाटनांदूर शाळेचे शिक्षक बालाजी तुळशीराम कुटे, नागेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. जी. हुंबे आणि लांजेश्वरचे ग्रामसेवक एस. ए. बनसोडे यांना गटविकास अधिका-यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबादUsmanabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद