शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्हा बँकांना शासनाने केलेली मदत निरुपयोगी ठरली : सुभाष देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:32 IST

मदतीमधून केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारी नियमित झाल्या

उस्मानाबाद : राज्यातील जवळपास १४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत़ यापैकी वर्धा, बुलढाणा, यवतमाळच्या बँकांना शासनाने सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांची मदत देऊ केली़ यातून केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारी नियमित केल्या गेल्या, असे वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी उस्मानाबादेत केले़

उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची शाखा सुरु करण्यात आली आहे़ या शाखेचे उद्घाटन सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते शनिवारी झाले़ यावेळी त्यांनी सहकारातील स्वाहाकारावर भाष्य केले़ ते म्हणाले, जिल्हा बँका या चुकीच्या प्रवृत्तींमुळे अडचणीत आल्या आहेत़ मदत केली तरी कामकाजात सुधारणा होत नाही़ वर्धा, बुलढाणा, यवतमाळच्या बँकांना मदत दिल्यानंतरही त्यांनी कामकाजात फारशी सुधारणा दाखवून दिली नाही़ त्यांच्या कर्जवसुलीत आशादायक चित्र दिसत नाही़ म्हणून शासकीय मदत हा अंतिम उपाय नव्हे, असेही देशमुख म्हणाले़

कडक कायदा विचाराधीन

सहकार वाचविण्यासाठी चुकीचे वागणाऱ्या पदाधिकाऱ्यांना १० वर्षे निवडणुका लढता येणार नाहीत, असा सहकारी कायदा केला़ मात्र, आजकाल कशावरही सहज स्टे मिळू लागला आहे़ परिणामी, या पदाधिकाऱ्यांना धाकच राहिला नाही़ ही बाब लक्षात घेता त्यांच्यात दहशत निर्माण होईल, असा कायदा शासनाच्या विचाराधीन असून, हमीभावाचा कायदाही कठोर अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुढील काळात शासनाच्या अखत्यारित दिसेल, अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी दिली़

मागच्या भोगींनीच सहकार बुडविलासहकारात त्यागी वृत्ती असायला हवी़ मात्र, मागच्या काळात भोगाची भूमिका ठेवून सहकारात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला़ यामुळे राज्यातील सुमारे २२ हजार सहकारी संस्थांपैकी ११ हजारांवर संस्था शेवटच्या घटका मोजत असल्याचा आरोप सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला़ सहकारी संस्थेवरील विश्वास वाढविण्यासाठी स्वत: संचालकांनी ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखbankबँकState Governmentराज्य सरकार