शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

भाविकांसाठी खुशखबर, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर राहणार २२ तास खुले

By गणेश कुलकर्णी | Updated: March 17, 2023 18:52 IST

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंदिर प्रशासन कार्यालयात बैठक पार पडली.

तुळजापूर : ३ एप्रिल ते ७ एप्रिल यादरम्यान श्री तुळजाभवानीची चैत्र पौर्णिमा यात्रा साजरी होणार असून, या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर २२ तास खुले ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांना चांगल्या सेवासुविधा देण्यासाठी मंदिर प्रशासनासह विविध शासकीय खात्यांनी तत्पर राहावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त डॉ. योगेश खरमाटे यांनी दिल्या.

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंदिर प्रशासन कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीस मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे, सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे, अभियंता राजकुमार भोसले, लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, विश्वास कदम, मुख्याधिकारी अरविंद नातू, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, एसटी आगारप्रमुख राजकुमार दिवटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. व्ही. होनमाने, आपत्ती व्यवस्थापनाच्या वृषाली तेलोरे, नायब तहसीलदार पाटील, महंत तुकोजीबुवा, पुजारी मंडळाचे बिपीन शिंदे, भोपी पुजारी मंडळाचे सुधीर कदम, उपाध्ये मंडळाचे अनंत कोंडो यांच्यासह पोलिस व महावितरणचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने चैत्र यात्राकाळात भवानी रोडवरील गर्दी टाळण्यासाठी भाविकांना घाटशीळ वहानतळामार्गे मंदिरात प्रवेश देणे, वाहनतळाजवळील भवानी तीर्थकुंड भाविकांना स्नानासाठी खुले करणे, टाकाऊ माळ-परड्यांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरापाठीमागे प्रांगणात तात्पुरत्या अग्निकुंडाची व्यवस्था करणे, यात्राकाळात पुजाऱ्यांनी ड्रेसकोड व ओळखपत्र वापरणे, देवी भाविकांना चांगल्या प्रकारे सेवा देणे, नगर परिषदेने शहर व परिसरातील साफसफाई व स्वच्छतेवर भर देणे, रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे, पाणपोई उभारणे, शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, सर्व पथदिवे चालू करणे, वाहनतळावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करणे, शहरात वाहने येऊ नयेत यासाठी शहराबाहेरील वाहनतळ चालू करणे, महावितरण कंपनीने वीजपुरवठा अखंड चालू ठेवणे, एसटी महामंडळाने यात्राकाळात बसस्थानक आठवडा बाजार येथे सुरू करणे, भाविकांच्या आरोग्यासाठी आरोग्य खात्याने सर्वतोपरी काळजी घेणे, यासोबतच चैत्र पौर्णिमा काळात मंदिर रात्री १ वाजता उघडून व रात्री वाजता बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादspiritualअध्यात्मिक