शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नव्या आदेशामुळे भूमाफियांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

कळंब : तुकडेबंदी कायद्याला धाब्यावर बसवत होणाऱ्या ‘दस्त’ नोंदणीस नोंदणी महानिरीक्षांच्या नव्या आदेशाने चाप बसला आहे. यामुळे सिमांत शेतकऱ्यांच्या ...

कळंब : तुकडेबंदी कायद्याला धाब्यावर बसवत होणाऱ्या ‘दस्त’ नोंदणीस नोंदणी महानिरीक्षांच्या नव्या आदेशाने चाप बसला आहे. यामुळे सिमांत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी निर्ढावलेल्या भूमाफियांची मात्र चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे.

जमिनीची धारणा, तुकडेकरण, एकत्रिकरण व नोंदणी यासंदर्भात राज्यात विविध कायद्याचा अंमल आहे. यापैकीच एक असलेल्या तुकडेबंदी व तुकडेजोड अधिनियम १९४७ मधील तरतुदी जमिनीचे तुकडे करणे, त्याचे एकत्रीकरण लागू आहेत. अनुषंगिक कायदे, नोंदणी अधिनियम याच्या अधीन राहतच दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन व्यवहाराचे दस्त नोंदणी होतात. असे असतानाही अलिकडे जमिनीचे वाढलेले मोल, नागरी वास्तव्यासाठी विस्तारत असलेली गावठाण, अशा कारणाने नियम धाब्यावर बसवत दस्त नोंदणी होत होती.

यातच एकरावर खरेदी करून गुंठ्यावर विकणारे ‘भूमाफिया’ यात स्थिरस्थावर झाल्यावर अशा बेकायदेशीर व्यवहारात मोठी वाढ झाली. तुकडेबंदी कायदा असतानाही एकाच सर्वे नंबरच्या सातबारावरील ‘मालकीहक्क’ एका पानात मावणार नाही एवढा मोठा झाला. बिनदिक्कतपणे घडणाऱ्या या प्रकाराची चौकशी करावी, असे आदेश सरकारने दिले होते. यानंतर यात सत्यता आढळली होती. यामुळे अखेर नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी १२ जुलै रोजी यास चाप बसवणारे परिपत्रक काढले. यासंबधीच्या अधिनियमातील ‘कलम ८ ब’ चा दाखला देत मंजूर पोटविभाग व रेखांकन संलग्न केल्याशिवाय दस्त नोंदवू नयेत, असे आदेशित केले आहे.

चौकट...

काय आहेत सूचना

एखाद्या सर्व्हे क्रमांकाचे क्षेत्र दोन एकर असेल तर त्याचे एक-दोन गुंठ्यात दस्त होणार नाहीत. त्याचा लेआऊट करून, त्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी घेतली तरच दस्त नोंद होईल.

यापूर्वी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी झाली असेल तर त्याच्या दस्तासाठी आता सक्षम प्राधिकाऱ्यांची अनुमती लागेल. तालुक्यात बागायतीसाठी २० गुंठे तर जिरायतीसाठी ८० गुंठे असे प्रमाणभूत क्षेत्र आहे. यामुळे अनेकांची गोची होईल.

एकादे अलाहिदा (स्वतंत्र तुकडा) क्षेत्र असेल, त्यास भूमिअभिलेखने मोजणी करून स्वतंत्र नकाशात नमूद केले असेल तर तशा तुकड्यांचे दस्त करता येतील. एकूणच या सर्व मुद्यांचे पालन होईल याची दुय्यम निबंधकांनी दक्षता घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईची तंबी दिली आहे.

कहीं खुशी, कहीं गम

महानिरीक्षांच्या नव्या आदेशाने ‘रजिस्ट्री’ कार्यालयात ‘वावर अन् पॉवर’ असलेली मंडळी हैराण आहे. हा आदेश सिमांत, अल्प जमीनधारक शेतकऱ्यांची कोंडी करणारा तर एकरावर घेऊन गुंठ्यात विक्री करणाऱ्या मंडळींसाठी ‘आफत’ ठरत आहे. शिवाय महसूल ते नगर रचना अशा वाऱ्याही वाढणार आहेत.

आदेशाचा अंमल सुरू : व्यवहार मंदावले

दरम्यान, दुय्यम निबंधक एस. बी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे आदेश आल्याचे व त्या नुसारच दस्त नोंदणी होत असल्याचे सांगितले. यामुळे दस्त नोंदणीची संख्या कमी झाल्याचेही ते म्हणाले.