शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

२९ जूनला मोर्चा; ‘जागरण-गोंधळा’ची तयारी पूर्ण, मराठा समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:42 IST

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होऊ घातलेल्या २९ जूनच्या जागरण-गोंधळ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे़

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होऊ घातलेल्या २९ जूनच्या जागरण-गोंधळ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे़ महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक आण्णासाहेब पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली़मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात ५८ मूक मोर्चे झाले़ मुंबईच्या मोर्चानंतर एक महिन्यात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते़ यावेळी काही घोषणा सरकारने केल्या होत्या़ मात्र, या घोषणांवरही अंमलबजावणी केली नाही़ मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून समाजाचा विश्वासघात केला आहे़ आता हे सरकार मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही, हे स्पष्ट झाल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला़ यामुळेच आता मुक नाही तर ठोक मोर्चे काढले जातील, ही भूमिका घेऊन आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करीत आहोत़ यात छञपती शिवाजी महाराज यांच्या नितीप्रमाणे गनिमी कावा पध्दतीने आंदोलने करण्यात येणार आहेत़ यापुढे सरकारला कुठलेही निवेदन दिले जाणार नाही, ना चर्चा करु, असेही आण्णासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी महेश सावंत, जिवनराजे इंगळे, सुनिल नागणे, अर्जून सांळुके, बबन सुद्रिके उपस्थित होतेमोर्चासाठी समित्या स्थापऩतुळजापुरातील जागरण-गोंधळ आंदोलनाचे संयोजक तुळजापूर-उस्मानाबाद आहेत़ मोर्चा यशस्वीतेसाठी आठ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत़ या आंदोलनाचे नियोजनही पुर्वीच्या मोर्चा प्रमाणेच राहणार असून, स्वछता, शांततेला महत्त्वाचे स्थान राहणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा