शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२९ जूनला मोर्चा; ‘जागरण-गोंधळा’ची तयारी पूर्ण, मराठा समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 06:42 IST

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होऊ घातलेल्या २९ जूनच्या जागरण-गोंधळ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे़

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने होऊ घातलेल्या २९ जूनच्या जागरण-गोंधळ आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे़ महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समन्वयक आण्णासाहेब पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली़मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात ५८ मूक मोर्चे झाले़ मुंबईच्या मोर्चानंतर एक महिन्यात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते़ यावेळी काही घोषणा सरकारने केल्या होत्या़ मात्र, या घोषणांवरही अंमलबजावणी केली नाही़ मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून समाजाचा विश्वासघात केला आहे़ आता हे सरकार मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही, हे स्पष्ट झाल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला़ यामुळेच आता मुक नाही तर ठोक मोर्चे काढले जातील, ही भूमिका घेऊन आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करीत आहोत़ यात छञपती शिवाजी महाराज यांच्या नितीप्रमाणे गनिमी कावा पध्दतीने आंदोलने करण्यात येणार आहेत़ यापुढे सरकारला कुठलेही निवेदन दिले जाणार नाही, ना चर्चा करु, असेही आण्णासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी महेश सावंत, जिवनराजे इंगळे, सुनिल नागणे, अर्जून सांळुके, बबन सुद्रिके उपस्थित होतेमोर्चासाठी समित्या स्थापऩतुळजापुरातील जागरण-गोंधळ आंदोलनाचे संयोजक तुळजापूर-उस्मानाबाद आहेत़ मोर्चा यशस्वीतेसाठी आठ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत़ या आंदोलनाचे नियोजनही पुर्वीच्या मोर्चा प्रमाणेच राहणार असून, स्वछता, शांततेला महत्त्वाचे स्थान राहणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली़

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा