शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतात पोट, हृदयाचे विकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर केला जात असतो. त्याच तेलाचा पुनर्वापर हा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हॉटेल, हातगाड्यांवर ...

उस्मानाबाद : रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर केला जात असतो. त्याच तेलाचा पुनर्वापर हा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हॉटेल, हातगाड्यांवर मात्र खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात असतो. अशा तेलाचे पदार्थ नियमित खाण्यात आल्याने नागरिकांना हृदयाचे आजार, मेंदूविकार, अपचन असे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे बाहेरील खाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. आहारात समाविष्ट असलेल्या भाज्यांमध्ये खाद्यतेल वापरले असते. त्यातून शरीराला कॅलरीज व पोषक घटक मिळत असतात. त्यामुळे तेल आवश्यकही मानले जाते. मात्र, त्याचा अतरिक वापरही शरीरास हानीकारक ठरू शकतो. त्यात पुनर्वापर केलेले खाद्यतेल सर्वांत घातक ठरू शकते. अशा तेलाचा वापर हॉटेल, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी केला जात असतो. पुनर्वापर झालेल्या तेलापासून पुरेसे उष्मांक भेटत नाहीत. कार्बन घटक वाढतात. त्यामुळे फुफ्फुसाचे आजार वाढण्याची शक्यता असते. हृदयाचे आजार, मेंदूविकार, अपचन असे आजार उद्भवत आहेत. तेलाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा मानला जातो. मात्र, जिल्ह्यात अशा प्रकारे तेलाचा पुनर्वापर करणाऱ्या एकाही विक्रेत्यावर गुन्हा नोंद झालेला नाही.

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वापर एक किंवा दोनदा होणे अपेक्षित आहे. पुनर्वापर वापर केल्यास तेलापासून फुफ्फुसाचे आजार उद्भवू शकतात. अपचनाचा त्रास, किडनीसंबंधीचे आजार, चरबी वाढणे, उच्चरक्तदाब, आतड्यांचे आजाराचा धोका आहे.

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

चिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उघड्यावर विक्रीस असलेले समोसे, वडापाव, भजी असे पदार्थावर ताव मारत असतात. अशा पदार्थ बनविण्यासाठी वारंवार त्याच तेलाचा वापर केलेला असतो. तसेच काही हॉटेलमध्येही दिवसभर त्याच तेलाचा पुनर्वापर करून पदार्थ बनविलेले जातात. त्यामुळे रस्त्यावरील न खाल्लेलेच उत्तम.

डॉक्टरांचा सल्ला

तेलाचा पुनर्वापर झाल्यास त्यात शरीराला कॅलरीज कमी प्रमाणात मिळतात. कार्बन घटक वाढतात. त्यात तळलेले पदार्थ खाण्यात आल्यास अपचनाचा त्रास, फुफ्फुसाचे आजार जडतात. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील खाणे टाळावे.

डॉ. राज गलांडे, फिजिशियन

खाद्यतेलाचा पुनर्वापराने सॅच्युरेटेड फॅट वाढतो. तेलाची क्वालिटी राहत नसल्याने पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे चरबी वाढते, ह्रदय, किडनीचे आजार, उच्चरक्तदाब, आतड्यांचे आजारही उद्भवतात. त्यामुळे पुनर्वापर टाळणे गरजचे आहे.

डॉ. तानाजी लाकाळ, फिजिशियन

तर होईल गुन्हा दाखल

तेलामध्ये २५ टक्क्यापेक्षा जास्त पोलार कम्पांउंड आरोग्यासाठी घातक असतात. दोन ते तीन वेळेपेक्षा तेलाचा वापर करता येत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तेलाचा पुनर्वापर न करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. पुनर्वापर केल्यास कारवाई केली जाते. तसेच १ लाखांर्यंत दंडही होऊ शकतो.

शि. बा. कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न, अन्न व औषध प्रशासन,

अहो आश्चर्यम, एकावरही कारवाई नाही

शहरातील हॉटेल, स्वीटमार्ट, उपाहारगृह, हागाड्यांवर तळलेले खाद्यपदार्थ बनवित असतात. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थांची भेसळ होऊ नये, तसेच तेलाचा पुनर्वापर केला जाऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनान विभागाचे नियंत्रण असते. मात्र, या चालू वर्षात तेलाचा पुनर्वापर केल्याप्रकरणी एकाही कारवाई झालेली नाही.