शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पंधरा दिवसांत नवीन उपकेंद्र पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

उमरगा : येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या वीज उपकेंद्रात १५ दिवसांतच पुन्हा बिघाड होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कामाच्या ...

उमरगा : येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या वीज उपकेंद्रात १५ दिवसांतच पुन्हा बिघाड होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कामाच्या दर्जाबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. या बिघाडामुळे गुरुवारी शहरातील न्यू बालाजी नगर भागातील वीज पुरवठा आठ तास बंद होता.

शहरात वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाल्याने सोमवारपासून हे उपकेंद्र बंद झाले आहे. यामुळे तीन दिवसांपासून अर्ध्या शहराचा वीज पुरवठा बंद झाला. जुन्याच पद्धतीने शहरात पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजता न्यू बालाजी नगरमधील वीज गायब झाली. आठ तासानंतर दुपरी साडेतीनच्या दरम्यान येथील वीज पुरवठा सुरू झाला. यामुळे पुन्हा शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

शहर व परिसरात विजेचा अतिरिक्त भार वाढल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यापूर्वी १७०- १८० ॲम्पियर असलेला विजेचा भार २०० ॲम्पियरपेक्षा पुढे गेल्याने विजेची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे अभियंता सूरज मोहिते यांनी शहरासाठी नवीन उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवून दिला होता. आ. ज्ञानराज चौगुले यांनी नवीन उपकेंद्र मंजूर करून घेतले; मात्र या उपकेंद्राचे काम तब्बल अडीच वर्षे रखडले होते. उमरगा शहरातील वीज पुरवठ्यासाठी १७ जून रोजी नवीन ३३/११ के. व्ही. वाहिनीची चाचणी घेण्यात आली. त्यावर (दत्तमंदिर फिडर) गुंजोटी रोड, दत्तमंदिर, नवीन आरोग्य नगर, चौरस्ता, बिरुदेव मंदिर परिसरातील वीज पुरवठा चालू करण्यात आला होता. सोमवारी रात्रीपासून नवीन उपकेंद्र बंद पडले. यामुळे पुन्हा विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.