शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत सुरू होणार पहिले टेस्ट ट्युब बेबी सेंटर

By admin | Updated: October 31, 2014 00:34 IST

उस्मानाबाद : शहरातील डॉ. राजगुरू यांच्या अक्षय हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह मोड्युलर टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरू करण्यात येत आहे.

उस्मानाबाद : शहरातील डॉ. राजगुरू यांच्या अक्षय हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह मोड्युलर टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरू करण्यात येत आहे. या सेंटरचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी होत असल्याची माहिती सेंटरचे डॉ. अदिनाथ राजगुरू यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. कौशाली राजगुरू यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना डॉ. राजगुरू म्हणाले की, अक्षय हॉस्पिटल आणि वंध्यत्व निवारण केंद्राच्या माध्यमातून आजवर हजारो अपत्यहीन जोडप्यांना अत्याधुनिक उपचार पध्दतीद्वारे अपत्य प्राप्तीचा आनंद दिला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशातूनही वंध्यत्त्वत्रस्त जोडपी येत गेली, आणि त्यांना अपत्य प्राप्तीचा आंनदही मिळत गेला. अनेक अद्ययावत उपचार करूनही अपत्य प्राप्ती होत नसल्यास शेवटचा पर्याय म्हणून टेस्ट ट्युब बेबी सेंटरकडे पाहिले जाते. परंतु, उस्मानाबाद व परिसरातील अपत्यहीन जोडप्यांना यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी जावे लागत होते. तसेच खर्चही मोठ्या प्रमाणात होत असे. परंतु, उस्मानाबादसारख्या भागातील दाम्पत्यांना हा खर्च पेलावत नसे. हीच गरज लक्षात घेवून आम्ही उस्मानाबाद येथे हे सेंटर सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. या सेंटरमध्ये जपान, इंग्लंड, डेन्मार्क, अमेरिका या देशातून अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच येथे असलेल्या ओहम डोनेशन (स्त्रीबीज दान), एम्ब्रीओ डोनेशन या सुविधांमुळे उपचार पद्धतीची यशस्वीता आणि परिणामकारकता सर्वाधिक असल्याचे डॉ. राजगुरू यांनी यावेळी सांगितले.सदरील सेंटरचे उद्घाटन २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जयपाल चव्हाण, टेस्ट टयुब बेबी स्पेशालिस्ट डॉ. सचिन कुलकर्णी, सोलापूरच्या मार्र्कं डेय सहकारी रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. माणिक गुर्रम, बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय शहापूरकर, डॉ. स्मिता शहापूरकर, एसबीआयचे चिफ मॅनेजर विजय डिकले आदींची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. सदरील कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. राजगुरू यांनी केले आहे.(वाणिज्य वार्ता)