शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

...अखेर लोहाऱ्याच्या वादग्रस्त बीडीओंची बदली; सरपंच-ग्रामसेवकांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 19:23 IST

गावस्तरावरील विकास कामे करण्यास जाणुन बुजुन आडथळा निर्माण करतात. असा आरोप सरपंच-ग्रामसेवकांनी करत आंदोलने केले होते.

- बालाजी बिराजदारलोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा पंचायत समितीचे बीडीओ सोपान अकेले यांची बदली करा अशी मागणी सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात येत होती. या मागणीला अखेर नऊ महिन्यानंतर न्याय मिळाला असून बीडीओ अकेले यांची बदली बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) पंचायत समितीला करण्यात आहे.

लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे पंचायत समिती कार्यालयात आल्यावर अपमानकारक बोलतात व  वृक्ष लागवड तसेच महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामासाठी जानुबूजुन आडवणूक करत पैशाची मागणी करतात पैसे नाही दिल्यास मस्टर काढत नाही. अशी धमकी देतात. त्याच बरोबर पंधराव्या वित्त आयोगाचे डीएसी काढण्यासाठी वारंवार टाळाटाळ करतात. त्यात गावस्तरावरील विकास कामे करण्यास जाणुन बुजुन आडथळा निर्माण करतात. असा आरोप सरपंच ग्रामसेवकांनी करत आंदोलने निवेदने दिली.

त्यानंतर २६ जूनला अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी अंती गटविकास अधिकारी अकेले हे १ जुलै ते ३१ जुलै या महीनाभरासाठी रजेवर गेले. त्यानंतर ते परत २ ऑगस्ट रोजी रुजू झाले आणि पुन्हा कोणते ही कारण पुढे करत ग्रामसेवकांना त्रास देत असल्याचे आरोप करीत त्याची बदली करा या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने १० ऑगस्ट पासुन असहकार आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी यांनी ही बदली मागणी शासनाकडे होती. अखेर ९ मार्च रोजी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने बीडीओच्या बदलीचे पत्र काढले असून त्याची बदली बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) पंचायत समितीला करण्यात आली आहे.

लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करावी यासाठी वेळोवेळी निवेदने आंदोलने करण्यात आली अखेर आमच्या मागणीची दखल घेत बदली करण्यात आली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अभार आहोत.- एम.टी.जगताप, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन

लोहारा पंचायत समितीचे बीडीओ सोपान अकेले हे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सरपंच,ग्रामसेवक,सदस्य, शिक्षक,कर्मचारी यांना सतत त्रास देत होते. यासंदर्भात आम्ही आवाज उठवून बदलीची मागणी लावून धरली अखेर त्यांची बदली झाली असून आमच्या लढ्याला राज्य सरकारने न्याय दिला. - मोहन पणुरे, जिल्हा समन्वयक, सरपंच परीषद मुंबई

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादTransferबदली