शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

...अखेर लोहाऱ्याच्या वादग्रस्त बीडीओंची बदली; सरपंच-ग्रामसेवकांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 19:23 IST

गावस्तरावरील विकास कामे करण्यास जाणुन बुजुन आडथळा निर्माण करतात. असा आरोप सरपंच-ग्रामसेवकांनी करत आंदोलने केले होते.

- बालाजी बिराजदारलोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा पंचायत समितीचे बीडीओ सोपान अकेले यांची बदली करा अशी मागणी सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात येत होती. या मागणीला अखेर नऊ महिन्यानंतर न्याय मिळाला असून बीडीओ अकेले यांची बदली बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) पंचायत समितीला करण्यात आहे.

लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे पंचायत समिती कार्यालयात आल्यावर अपमानकारक बोलतात व  वृक्ष लागवड तसेच महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामासाठी जानुबूजुन आडवणूक करत पैशाची मागणी करतात पैसे नाही दिल्यास मस्टर काढत नाही. अशी धमकी देतात. त्याच बरोबर पंधराव्या वित्त आयोगाचे डीएसी काढण्यासाठी वारंवार टाळाटाळ करतात. त्यात गावस्तरावरील विकास कामे करण्यास जाणुन बुजुन आडथळा निर्माण करतात. असा आरोप सरपंच ग्रामसेवकांनी करत आंदोलने निवेदने दिली.

त्यानंतर २६ जूनला अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी अंती गटविकास अधिकारी अकेले हे १ जुलै ते ३१ जुलै या महीनाभरासाठी रजेवर गेले. त्यानंतर ते परत २ ऑगस्ट रोजी रुजू झाले आणि पुन्हा कोणते ही कारण पुढे करत ग्रामसेवकांना त्रास देत असल्याचे आरोप करीत त्याची बदली करा या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने १० ऑगस्ट पासुन असहकार आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परीषदेचे मुख्य अधिकारी यांनी ही बदली मागणी शासनाकडे होती. अखेर ९ मार्च रोजी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने बीडीओच्या बदलीचे पत्र काढले असून त्याची बदली बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) पंचायत समितीला करण्यात आली आहे.

लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करावी यासाठी वेळोवेळी निवेदने आंदोलने करण्यात आली अखेर आमच्या मागणीची दखल घेत बदली करण्यात आली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अभार आहोत.- एम.टी.जगताप, जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन

लोहारा पंचायत समितीचे बीडीओ सोपान अकेले हे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सरपंच,ग्रामसेवक,सदस्य, शिक्षक,कर्मचारी यांना सतत त्रास देत होते. यासंदर्भात आम्ही आवाज उठवून बदलीची मागणी लावून धरली अखेर त्यांची बदली झाली असून आमच्या लढ्याला राज्य सरकारने न्याय दिला. - मोहन पणुरे, जिल्हा समन्वयक, सरपंच परीषद मुंबई

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादTransferबदली