शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST

ईट : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी बांबूची लागवड करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी ...

ईट : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी बांबूची लागवड करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पटेल म्हणाले, दगडी कोळसा वापरून सध्या वीजनिर्मिती केली जाते. यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. याऐवजी बांबू, धानाचा भुसा व कपाशीची लाकडे वीजनिर्मितीसाठी वापरल्यास थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये तर कार्बनचे उत्सर्जन कमी होईलच, शिवाय पर्यावरण संतुलनासाठीदेखील फायदा होईल. बांबूपासून इथेनॉलनिर्मितीही होते. पेट्रोल-डिझेलच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, त्यासाठी पर्याय म्हणून इथेनॉल आहे. बांबूचे एक झाड एका वर्षाकाठी ३०० किलो ऑक्सिजन निर्माण करते, तर एका माणसाला २८० किलो ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे बांबू हा उपयोगी वृक्ष आहे. प्लास्टिक, लोखंड, सिमेंट यासारख्या वस्तूच्या वापराला बांबू हा पर्याय आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चीतंपल्ली येथे शंभर कोटी रुपये खर्च करून बांबूपासून इमारत तयार केली आहे. सध्या औद्योगिकीकरणामुळे कार्बनचे उत्सर्जन वातावरणात वाढत आहे. ते थांबवायचे असेल व जगातील जीवजंतू सुरक्षित ठेवायचे असतील, तर पर्यावरणासाठी बांबू लागवड आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच संजय आसलकर यांच्या हस्ते पाशा पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, माजी उपसरपंच प्रवीण देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. अप्पासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रविराज देशमुख, गणेश चव्हाण, सुरेंद्र बोंदाडे, सुनील देशमुख, युवराज हुंबे आदी उपस्थित होते.