शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST

ईट : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी बांबूची लागवड करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी ...

ईट : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी बांबूची लागवड करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पटेल म्हणाले, दगडी कोळसा वापरून सध्या वीजनिर्मिती केली जाते. यामुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. याऐवजी बांबू, धानाचा भुसा व कपाशीची लाकडे वीजनिर्मितीसाठी वापरल्यास थर्मल पाॅवर स्टेशनमध्ये तर कार्बनचे उत्सर्जन कमी होईलच, शिवाय पर्यावरण संतुलनासाठीदेखील फायदा होईल. बांबूपासून इथेनॉलनिर्मितीही होते. पेट्रोल-डिझेलच्या वापरामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, त्यासाठी पर्याय म्हणून इथेनॉल आहे. बांबूचे एक झाड एका वर्षाकाठी ३०० किलो ऑक्सिजन निर्माण करते, तर एका माणसाला २८० किलो ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे बांबू हा उपयोगी वृक्ष आहे. प्लास्टिक, लोखंड, सिमेंट यासारख्या वस्तूच्या वापराला बांबू हा पर्याय आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चीतंपल्ली येथे शंभर कोटी रुपये खर्च करून बांबूपासून इमारत तयार केली आहे. सध्या औद्योगिकीकरणामुळे कार्बनचे उत्सर्जन वातावरणात वाढत आहे. ते थांबवायचे असेल व जगातील जीवजंतू सुरक्षित ठेवायचे असतील, तर पर्यावरणासाठी बांबू लागवड आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच संजय आसलकर यांच्या हस्ते पाशा पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, माजी उपसरपंच प्रवीण देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख निलेश चव्हाण, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. अप्पासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रविराज देशमुख, गणेश चव्हाण, सुरेंद्र बोंदाडे, सुनील देशमुख, युवराज हुंबे आदी उपस्थित होते.