शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’मधून मिळावी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:34 IST

उस्मानाबाद -ऑक्टाेबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. अशा बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून भरीव निधी द्यावा, ...

उस्मानाबाद -ऑक्टाेबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. अशा बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून भरीव निधी द्यावा, अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहारच्या चर्चेत सहभाग नाेंदवून केली.

उस्मानाबाद जिह्यासह, बार्शी, औसा व निलंग्यासह राज्यात ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे २ लाख ६२ हजार हेक्टर इतके क्षेत्र, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ७५ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ६८ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र व लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तालुक्यातील १ लाख ५२ हजार ४१७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ७७७ हेक्टर असे एकूण ६ लाख ४३ हजार ९९८ शेतकऱ्यांचे ४ लाख २६ हजार ६४५ हेक्टरवरील क्षेत्राचे तसेच जनावरे, राहत्या घरांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी ९ डिसेंबर २०२० रोजी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे ‘एनडीआरएफ’मधून ३ हजार ७२१ कोटीचा प्रस्ताव मंजूर करून निधी राज्य शासनाला वर्ग करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात २७ जुलै रोजी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रश्न उत्तराच्या तासात सहभाग घेऊन केंद्र सरकारची ‘एनडीआरएफ’ची शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी ऑक्टोबर-२०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’मधून ७०१ कोटी मंजूर केल्याचे सांगितले. दरम्यान, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. अद्याप मदतीतील छदामही मिळालेला नाही आणि रक्कमही तुटपुंजी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मदतीची रक्कम वाढवून तातडीने वितरित करावी, अशी मागणी खा. ओमराजे यांनी केली.