शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 19:06 IST

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुळजापूर (उस्मानाबाद ) : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे आज पहाटेच्या सुमारास घडली़

बारुळ येथील युवक शेतकरी ज्योतालिंग भीमाशंकर मेनकुदळे (वय ३८) यांचे गावच्या शिवारात कोरडवाहू शेत आहे़ मागील तीन-चार वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेने शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते़ शिवाय राष्ट्रीयकृत बँकेचा असलेला कर्जाचा डोंगर वाढत होता़ शेतातून न मिळणारे उत्पन्न व डोक्यावरील कर्जामुळे या शेतकऱ्याने कामासाठी मुंबई गाठली होती़ परंतु तेथे म्हणावे तसे काम न मिळाल्याने तो हाताश झाला होता़

नापिकी आणि कर्जामुळे हताश झालेल्या ज्योतालिंग मेनकुदळे यांनी गुरूवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली़ या घटनेची तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास पोहेकॉ जे.व्ही.शिंदे हे करीत आहेत़ तलाठी संदीप जगदाळे, कृषी सहाय्यक व्ही.डी.माळी यांनीही घटनेचा पंचनामा केला आहे़ मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे़

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबादbankबँक