शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ सर्कलमध्ये अतिवृष्टी; मंगरूळ मंडळात सर्वाधिक १५० मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 17:03 IST

दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

उस्मानाबाद : दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये सर्वाधिक १५० मिलीमीटर पाऊस पडला. पावसाअभावी धास्तावलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप पिके जोमात असतानाच वरूणराजाने दडी मारली. जवळपास महिनाभरापासून पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनसारखी नगदी पिके धोक्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. असे असतानाच बुधवारी चार वाजल्यानंतर रिमझीम पावसाला सुरूवात झाली. रात्री आठ वाजेनंतर पावसाने जोर धरला. पावसाची ही रिपरिप आज दुपारी बाजरा वाजेपर्यंतही सुरूच होती. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत  ४७.५८ मिलीमीरट पाऊस पडला आहे. सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव मंडळात ९७ मिमी, नळदुर्ग ८०, मंगरूळ १५०, इटकळ १२५, तुळजापूर ६७, उमरगा तालुक्यातील ८१ आणि भूम तालुक्यातील भूम मंडळामध्ये ६८ मिमी पाऊस कोसळला. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबाद