शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

अपेक्षा होती ८०० कोटींच्या विम्याची मिळाले ४०७ कोटी; आढेवेढे घेत विमा कंपनी झाली अखेर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 23:41 IST

विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टी व पावसाचा खंड, अशा विचित्र निसर्गयोगाने यावेळी शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात विमा कंपनीने प्रचंड आढेवेढे घेत अखेरीस ४०७ कोटी रुपये भरपाई देण्याचे निश्चित करून त्याचे वितरण सुरू केले आहे. प्रत्यक्षात ही भरपाई ८०० कोटींच्या घरात असणे अपेक्षित असल्याचा दावा लोकप्रतिनिधींनीनी केलेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यंदा विचित्र निसर्गयोगाचा अनुभव घेतला. आधी पावसाचा दीर्घ खंड व नंतर अतिवृष्टी. या दोन्ही प्रतिकूल स्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, विमा कंपनी हे नुकसान मान्य करण्यास तयार नव्हती. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या रेट्यामुळे कंपनी अखेर तयार झाली. विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ही भरपाई जवळपास ८०० कोटींच्या घरात मिळणे अपेक्षित आहे. 

दरम्यान, कंपनीने ३ लाख ४२ हजार४२२ शेतकऱ्यांना पत्र ठरवून त्यांना ४०६.९९ कोटी रुपये विमा मंजूर केला आहे. त्याचे वितरणही सुरू असून, २४९.३५ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याचे विमा कंपनीने कळविले आहे.

सेना खासदार, आमदारांचा आक्षेप...सेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या भरपाईवर आक्षेप घेतला आहे. समाजमाध्यमात त्यांनी रात्री उशिरा केलेल्या पोस्टनुसार भरपाई निम्मीच मिळाल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या एका नोटिफिकेशनला जबाबदार धरले असून, खासदारांनी याबाबत संसदेत तर आमदारांनी न्यायालयीन लढा लढण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी