शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

कारभार हाकता येत नसेल तर ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन कारकुनी करावी : प्रवीण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:37 IST

सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष काँग्रेसला विचारात घेत नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांमध्येही संवादाचा अभावमराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही...

उस्मानाबाद : ग्राहकांचे वीजबिल माफ करण्याचा शब्द सुरूवातीला ऊर्जामंत्र्यांनीच दिलेला होता. आता मात्र सक्तीने वीजबिल वसूल करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. हा प्रकार सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखा आहे. त्यामुळे खात्याचा कारभार हाकता येत नसेल तर राजीनामा देऊन ऊर्जामंत्र्यांनी महावितरणमध्ये कारकुनाची नोकरी करावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला. शनिवारी ते उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता, घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले की, २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेलला आहे. मात्र, याबाबतीततही सरकारची भूमिका गोंधळाची आहे. मुंबई, ठाणे येथील शाळा बंद राहणार आहेत. मग हाच नियम राज्यातील अन्य शाळांना का लागू नाही ? असा सवाल करीत सरकारच्या धोरणावर चौफेर टीका केली. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. क्वारंटाईन केंद्रात अत्याचार होत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाहीत. त्यामुळे सगळीकडे अस्थिरतेचे वातारण आहे. अशा स्थितीत जनतेला विश्वास देण्याची गरज सरकारची आहे. परंतु, तीन पक्षांचे मिळून बनलेल्या सरकारच्या कृतीतून तसे घडताना दिसत नाही. सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष काँग्रेसला विचारात घेत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांमध्येही संवादाचा अभाव असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला. पत्रकार परिषदेस भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, सुधीर पाटील, व्यंकट गुंड, प्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही...माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ केले होते. ते आरक्षण टिकिवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार गंभीर दिसत नाही. आरक्षणाचा प्रश्न सरकार भिजत ठेवत आहे. परिक्षा घेतल्या नाहीत. या माध्यमातून तर समाजालाही झुलवत ठेवण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणOsmanabadउस्मानाबाद