शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी ...

तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास साडेसातशे छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक व दोन-अडीच हजार पुजाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले असून, मंदिर उघडून व्यवसाय करू द्या, अशी मागणी पुजारी, व्यापाऱ्यांमधून होत आहे.

मार्च-२०२० मध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्याने श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. ते तब्बल आठ ते नऊ महिने बंद राहिले. यामुळे शहरातील जवळपास अडीच हजार पुजाऱ्यांसह हळद-कुंकू, फूल, हार, ओटी, नारळ, पेढा, खेळणी, मूर्ती विक्रेते, हॉटेल, लॉजमालक आदी व्यावसायिकांसह मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास ७५० ते ८०० व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर प्रशासनाने नियम, अटी लादून भाविकांसाठी मंदिर खुले केले. यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये प्रशासनाने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. व्यापारी, व्यावसायिक, पुजारी पुन्हा आर्थिक संकटात सापडले.

दरम्यान, मागील आठवड्यात ज्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्या ठिकाणी पाच टप्प्यांमध्ये सर्व व्यवसाय, व्यवहार वेळेची बंधने घालून व कोरोनाचे नियम लावून खुले केले आहेत. मात्र, भाविकांसाठी बंद असलेल्या मंदिराचा प्रश्न मात्र अनुत्तरित असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या पुजारी, व्यापारी, व्यावसायिकांची अडचण कायम आहे.

कोट..........

आम्ही देवीच्या मूर्ती आणि पूजा साहित्याचे दुकान चालवून कुटुंबाची उपजीविका भागवितो; मात्र, कोरोनामुळे पहिल्या टप्प्यात ८ महिने मंदिर बंद होते. यामुळे व्यवसायही ठप्प झाल्याने कुटुंबाचे अतोनात हाल झाले. त्यानंतर काही दिवस मंदिर खुले केल्यामुळे व्यवसाय मूळ पदावर येत होता. परंतु, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा भाविकांसाठी मंदिर बंद केल्याने व्यवसाय बंद झाला. यामुळे आर्थिक अडचणीत भर पडली आहे. शहरातील ८० टक्के नागरिक देवीच्या मंदिरावर अवलंबून आहेत. मंदिर उघडत नसल्याने आमच्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे पत्रही मी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

- संजय बोंदर, व्यापारी