शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

पुजारी, व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी ...

तुळजापूर : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास साडेसातशे छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक व दोन-अडीच हजार पुजाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले असून, मंदिर उघडून व्यवसाय करू द्या, अशी मागणी पुजारी, व्यापाऱ्यांमधून होत आहे.

मार्च-२०२० मध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्याने श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. ते तब्बल आठ ते नऊ महिने बंद राहिले. यामुळे शहरातील जवळपास अडीच हजार पुजाऱ्यांसह हळद-कुंकू, फूल, हार, ओटी, नारळ, पेढा, खेळणी, मूर्ती विक्रेते, हॉटेल, लॉजमालक आदी व्यावसायिकांसह मंदिरावर अवलंबून असलेले जवळपास ७५० ते ८०० व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर प्रशासनाने नियम, अटी लादून भाविकांसाठी मंदिर खुले केले. यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये प्रशासनाने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. व्यापारी, व्यावसायिक, पुजारी पुन्हा आर्थिक संकटात सापडले.

दरम्यान, मागील आठवड्यात ज्या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्या ठिकाणी पाच टप्प्यांमध्ये सर्व व्यवसाय, व्यवहार वेळेची बंधने घालून व कोरोनाचे नियम लावून खुले केले आहेत. मात्र, भाविकांसाठी बंद असलेल्या मंदिराचा प्रश्न मात्र अनुत्तरित असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या पुजारी, व्यापारी, व्यावसायिकांची अडचण कायम आहे.

कोट..........

आम्ही देवीच्या मूर्ती आणि पूजा साहित्याचे दुकान चालवून कुटुंबाची उपजीविका भागवितो; मात्र, कोरोनामुळे पहिल्या टप्प्यात ८ महिने मंदिर बंद होते. यामुळे व्यवसायही ठप्प झाल्याने कुटुंबाचे अतोनात हाल झाले. त्यानंतर काही दिवस मंदिर खुले केल्यामुळे व्यवसाय मूळ पदावर येत होता. परंतु, दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा भाविकांसाठी मंदिर बंद केल्याने व्यवसाय बंद झाला. यामुळे आर्थिक अडचणीत भर पडली आहे. शहरातील ८० टक्के नागरिक देवीच्या मंदिरावर अवलंबून आहेत. मंदिर उघडत नसल्याने आमच्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे पत्रही मी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

- संजय बोंदर, व्यापारी