शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राखी पौर्णिमेमुळे एसटी बसला प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : राखी पाैर्णिमानिमित्त प्रवाशांची संख्या वाढली असून, महामंडळाच्या वतीने बसची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा आगारातून ३२ ...

उस्मानाबाद : राखी पाैर्णिमानिमित्त प्रवाशांची संख्या वाढली असून, महामंडळाच्या वतीने बसची संख्याही वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा आगारातून ३२ जादा बस सोडण्यात आल्या आहेत.

राखी पौर्णिमेला महिला भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात. तर भाऊरायाही आपल्या बहिणीच्या गावी जाऊन राखी बांधून घेत असतात. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते;परंतु गतवर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे महिलांना आपल्या माहेरी जाता आले नाही. दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे माहेरी जाणाऱ्या महिलांची गर्दी वाढली आहे. उस्मानाबाद बसस्थानकात प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

या मार्गावर वाढल्या फेऱ्या

उस्मानाबाद-सोलापूर

उस्मानाबाद-लातूर

उस्मानाबाद-कळंब-परभणी

उस्मानाबाद-पुणे

उमरगा-लातूर

उमरगा-पुणे

प्रवाशांची गर्दी

उस्मानाबाद विभागाच्या सहा आगारातून सध्या ३३० बस धावू लागल्या आहेत.

प्रतिदिन १ लाख ३५ हजार किलोमीटर प्रवास होत असून, यातून एसटीला ३२ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

मागील आठ दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.

राखी पौर्णिमेला प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे जादा बस सोडण्यात येत आहेत. उस्मानाबाद आगारातून लातूर, सोलापूर, पुणे या मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. शिवाय, कळंबमार्गे परभणी बस सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांना बसमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.

पांडुरंग पाटील, आगारप्रमुख, उस्मानाबाद