शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नाद करायचा नाय, इथे आपलीच चालते !; माजी खासदारांनी ताणले नामदारांवर धनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 10:38 IST

‘नाद करायचा नाय़़’ असा डॉयलॉग हाणत माजी खासदार गायकवाड यांनी सेनेतील नामदारांवर धनुष्यबाण ताणले आहे़

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मोहरा बदलून ओम राजेनिंबाळकर हा युवा चेहरा समोर आणला़ नामदार सावंत हे गायकवाड यांच्यासाठी ‘खलनायक’ ठरले़

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन शिवसेना नेत्यात पडलेला विस्तव विझला, असे वाटत असतानाच माजी खासदारांनी या निखाऱ्यावर जमलेली राख उडवून लावली़ ‘नाद करायचा नाय़़’ असा डॉयलॉग हाणत माजी खासदार गायकवाड यांनी सेनेतील नामदारांवर धनुष्यबाण ताणले आहे़

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने मोहरा बदलून ओम राजेनिंबाळकर हा युवा चेहरा समोर आणला़ तत्कालीन खासदार प्रा़ रवी गायकवाड हे जनतेच्या संपर्कात नसल्याचा दावा  करीत त्यांना स्वपक्षातूनच मोठा विरोध झाला़ ‘इलेक्टीव्ह मेरिट’चे सूत्र वापरुन जलसंधारणमंत्री प्रा़ तानाजी सावंत यांनीही ओम राजेनिंबाळकर यांच्यासाठी मातोश्रीवर आग्रह धरला, हे लपून  राहिलेले नाही़ नामदार सावंत हे गायकवाड यांच्यासाठी ‘खलनायक’ ठरले़ नेमके हेच शल्य प्रा़ रवी गायकवाड यांना अजूनही बोचत आहे़ निवडणूक प्रचारकाळात खुद्द उद्धव ठाकरे यांनी गायकवाड व त्यांच्या पुत्रांचे पुनर्वसन करु, असा शब्द  दिल्यानंतरही त्यांनी पक्षाचे काम केले नाही़ याही पुढे जावून त्यांनी विरोधाचीच भूमिका घेतल्याचे दिसून आले़ मात्र, परिणाम फारसा झाला नाही़ निवडणुका झाल्या, निकाल लागला़ उमरगा विधानसभा मतदारसंघातून विरोधानंतरही शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले़ 

यानंतरच्या काळात माजी खा़ रवी गायकवाड हे शांत बसले होते़ दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘मातोश्री’वर गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ‘आशिर्वाद’ मिळविले़ कदाचित या आशिर्वादातून मिळालेल्या अवसानावर त्यांनी काहिश्या शांत झालेल्या निखाºयावरील राख उडवून तो धगधगता ठेवला़ उमरग्यात परवा आयोजित एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात ‘नाद करायचा नाय़़़ काय करायचं ते रवी गायकवाडच ठरवेल या तालुक्यात़़़’, अशी डॉयलॉगबाजी करीत त्यांनी पुन्हा धनुष्य ताणले़ त्यांच्या बाणाचा रोख सावंत यांच्यासोबतच खासदार राजेनिंबाळकरांच्याही दिशेने होता़ आता या बाणात किती त्राण आहे? याचे उत्तर येणाºया विधानसभा निवडणुकीतूनच मिळू शकेल़

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाOsmanabadउस्मानाबादPoliticsराजकारण