शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

‘झेडपी’चा शिक्षण विभाग नकाे रे बाबा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:34 IST

नशिबी पुन्हा प्रभारीराज : रुजू हाेण्यापूर्वीच शिक्षणाधिकारी राठाेड यांनी करून घेतली बदली उस्मानाबाद : निती आयाेगाने उस्मानाबादच्या भाळी मागासलेपणाचा ...

नशिबी पुन्हा प्रभारीराज : रुजू हाेण्यापूर्वीच शिक्षणाधिकारी राठाेड यांनी करून घेतली बदली

उस्मानाबाद : निती आयाेगाने उस्मानाबादच्या भाळी मागासलेपणाचा शिक्का मारला आहे. हा शिक्का पुसण्यासाठी शैक्षणिक, आराेग्य आदी घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश हाेते. यासाठी काेट्यवधींचा निधी देण्यात आला. असे असतानाच दुसरीकडे ज्यांच्या खांद्यावर शिक्षणविषयक उपाययाेजना पूर्ण क्षमतेने राबवून घेण्याची जबाबदारी असते, ते शिक्षणाधिकारी हे पदच मागील काही वर्षांपासून रिक्त आहे. माेठ्या प्रतीक्षेनंतर साेलापूर येथील शिक्षणाधिकारी संजयकुमार राठाेड यांची उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली; परंतु रुजू न हाेताच त्यांनी सांगली येथे बदली करून घेतली आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांच्या नशिबी पुन्हा प्रभारीराज आले आहे.

निती आयाेगाने उस्मानाबादचा मागास जिल्ह्यांच्या यादीत समावेश केल्यानंतर राजकीय नेत्यांनी आराेपांच्या माध्यमातून चिखलफेक केली. जिल्ह्याच्या भाळी हा शिक्का बसण्यास काेण जबाबदार? यावरून पत्रकबाजीही झाली. दरम्यान, मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी काेट्यवधी रुपयांचा निधी दिला गेला. या माध्यमातून खासकरून शिक्षण आणि आराेग्य या दाेन घटकांवर भर दिला गेला. मात्र, निती आयाेगाने सुचविलेल्या उपाययाेजनांची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी असलेले शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणजेच शिक्षणाधिकारी हे पद मागील काही वर्षांपासून रिक्त आहे, तेव्हापासून या पदाच्या बाबतीत खाे-खाे सुरू आहे. नियमित शिक्षणाधिकारी जगताप निलंबित झाल्यानंतर काही महिने तत्कालीन गटशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांच्याकडे चार्ज देण्यात आला. यानंतर सविता कुंभार यांची काही महिने सूत्रे सांभाळली. पदाेन्नतीच्या माध्यमातून सविता भाेसले यांची नियमित शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्याही वर्षभरातच सेवानिवृत्त झाल्या आणि पुन्हा प्रभारीराज सुरू झाले. शिवाजी जाधव यांच्याकडे या पदाची सूत्रे आली. त्यांनी काही महिने कामकाज पाहिल्यानंतर सेवानिवृत्त झाले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी जाधव यांच्याकडे प्रभार देण्यात आला. ते सेवानिृत्त झाल्यानंतर पुन्हा सविता कुंभार यांच्याकडे सूत्रे आली. त्यांची उस्मानाबादचे गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर काेणीही पदभार घेण्यास राजी नव्हते. त्यामुळे अधीक्षक रामलिंग काळे यांच्याकडे चार्ज देण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली. त्यांनी अनेक महिने काम पाहिल्यानंतर उपशिक्षणाधिकारी म्हणून डाॅ. माेहरे रुजू झाले. यानंतर त्यांच्याकडे चार्ज दिला. मध्यंतरी शासनाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात साेलापूरचे शिक्षणाधिकारी राठाेड यांची उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा आदेश ३० जून राेजी निघाला हाेता. तातडीने चार्ज घेण्याबाबत त्यात नमूद केले हाेते; परंतु अडीच महिन्यांचा कालावधी लाेटूनही त्यांनी चार्ज घेतला नाही. असे असतानाच १६ सप्टेंबर राेजी त्यांच्या बदली आदेशात अंशत: बदल केल्याचे पत्र धडकले. त्यांनी सांगली येथे बदली करून घेतली आहे. त्यामुळे मागासलेपणास कारणीभूत असलेल्या कारणांच्या यादीत अव्वलस्थानी असलेल्या शिक्षण या घटकाचा दर्जा उंचाविणाऱ्या शिक्षण विभागाच्या नशिबी पुन्हा प्रभारीराज आले आहे. हे असेच सुरू राहिल्यास शिक्षणाचा दर्जा उंचावणार कसा, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

चाैकट...

लाेकप्रतिनिधी लक्ष देणार कधी?

शिक्षण आणि आराेग्य या दाेन बाबींना अत्यंत महत्त्व आहे. शहरी, तसेच ग्रामीण भागातील गाेरगरीब मुलांचे शिक्षण आजही जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांतून हाेते. या शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांची असते. मात्र, हे पदच तीन-तीन वर्षे रिक्त असेल तर गुणवत्तेचे काय हाेणार? शेजारच्या लातूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नेतेमंडळी चांगल्या अधिकाऱ्यांसाठी प्रयत्न करतात; परंतु आपल्याकडे रिक्त जागा भरण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे विशेष.