शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 19:32 IST

MNS on field for the name 'Dharashiv' for Usmanabad मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या.

ठळक मुद्देस्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर व्हावे, असे १९८८ साली जाहीर केले होते. ज्या स्वप्नासाठी सरकार स्थापन झाले, ते त्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, असा आग्रह मनसेने धरला आहे. 

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराच्या नामांतरावर बसलेली धूळ यावेळी मनसेने उडविली आहे. सोमवारी त्यांनी या संदर्भात निवेदन देऊन तातडीने ही नामांतर प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला व सरकार स्थापन केले. मग त्यांनी बाळासाहेबांचे नामांतर विषयीचे स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर व्हावे, असे १९८८ साली जाहीर केले होते. त्यांचे हे स्वप्न होते, त्यांची ती भावना होती. मग ज्या स्वप्नासाठी सरकार स्थापन झाले, ते त्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, असा आग्रह मनसेने धरला आहे. 

उस्मानाबाद हे नाव शेवटचा निजाम राजा मीर उस्मान अली याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. राज्यात शिवसेना सरकारमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने नामांतर करावे, अशी मागणीही मनसेने केली आहे. यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन, उमेश कांबळे, सौरभ देशमुख, अक्षय सावळे, वेदकुमार पेंदे, रामभाऊ मोटे, नितेश कोकाटे व पदाधिकारी उपस्थित होते.

१९९५ साली प्रक्रिया१९०५ साली नळदुर्गहून जिल्हा मुख्यालय धाराशिवला हलविल्यानंतर हे नामकरण झाले आहे. त्यामुळे आता बदल करणे आवश्यक आहे, असे मनसेने नमूद केले आहे. दरम्यान, १९९५ साली युतीचे सरकार आल्यानंतर काही काळ याची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, नंतर ती थांबली. ती स्थिती अद्यापपर्यंत कायम आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMNSमनसे