शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जाचक आदेशामुळे कष्टकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ ...

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व चहा टपऱ्या बंद केल्या. यामुळे यावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांच्या कामावर गंडांतर आले आहे. यापूर्वीच्या लॉकाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक महिलांनी आपले दागदागिने गहाण ठेवून व मोडून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांच्याकडे कुठलेही साधन नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीत कोरोनापेक्षा उपासमारीने लोकांचा जीवन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊननंतर पोटाला चिमटा घेऊन बँका, पतसंस्था, पतपेढ्या, बचत गट व खासगी फायनान्स यांच्याकडून घेतलेले कर्ज परत फेडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, या लॉकडाऊनमुळे पुन्हा हे अर्थचक्र थंडावल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा आदेश तत्काळ रद्द करून जनतेला खुलेआम जगण्याची परवानगी द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावर जिल्हाध्यक्ष राजभाऊ ओव्हाळ यांच्यासह रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव प्रताप कदम, मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे आदींच्या सह्या आहेत.

चौकट.......

रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवा

भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी आठवड्याची हक्काची असलेली बाजारपेठ बंद करून शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे. जनावरांचे दूध सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास काढले जाते. ते विक्री करण्यासाठी आपण बंदी केल्यामुळे त्या दुधाची अक्षरश: नासाडी होत आहे, शिवाय सायंकाळी ७ वाजल्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे मोलमजुरीच्या कामावरून सुट्टी झाल्यानंतर भाजीपाला, तेल, मीठ, मिरची व जीवनावश्यक साहित्य कुठे व कसे खरेदी करायचे, असा प्रश्नही सर्वसामान्यांना सतावत आहे. त्यामुळे रात्री किमान १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.