शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जाचक आदेशामुळे कष्टकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ ...

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व चहा टपऱ्या बंद केल्या. यामुळे यावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांच्या कामावर गंडांतर आले आहे. यापूर्वीच्या लॉकाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक महिलांनी आपले दागदागिने गहाण ठेवून व मोडून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांच्याकडे कुठलेही साधन नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीत कोरोनापेक्षा उपासमारीने लोकांचा जीवन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊननंतर पोटाला चिमटा घेऊन बँका, पतसंस्था, पतपेढ्या, बचत गट व खासगी फायनान्स यांच्याकडून घेतलेले कर्ज परत फेडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, या लॉकडाऊनमुळे पुन्हा हे अर्थचक्र थंडावल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा आदेश तत्काळ रद्द करून जनतेला खुलेआम जगण्याची परवानगी द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावर जिल्हाध्यक्ष राजभाऊ ओव्हाळ यांच्यासह रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव प्रताप कदम, मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे आदींच्या सह्या आहेत.

चौकट.......

रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवा

भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी आठवड्याची हक्काची असलेली बाजारपेठ बंद करून शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे. जनावरांचे दूध सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास काढले जाते. ते विक्री करण्यासाठी आपण बंदी केल्यामुळे त्या दुधाची अक्षरश: नासाडी होत आहे, शिवाय सायंकाळी ७ वाजल्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे मोलमजुरीच्या कामावरून सुट्टी झाल्यानंतर भाजीपाला, तेल, मीठ, मिरची व जीवनावश्यक साहित्य कुठे व कसे खरेदी करायचे, असा प्रश्नही सर्वसामान्यांना सतावत आहे. त्यामुळे रात्री किमान १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.