शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

जाचक आदेशामुळे कष्टकऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ ...

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या आडून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाचक आदेशामुळे कष्टकरी, मजूर, गरीब जनता अडचणीत सापडत आहे. त्यामुळे हे आदेश तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व चहा टपऱ्या बंद केल्या. यामुळे यावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांच्या कामावर गंडांतर आले आहे. यापूर्वीच्या लॉकाऊन काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक महिलांनी आपले दागदागिने गहाण ठेवून व मोडून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांच्याकडे कुठलेही साधन नाही. त्यामुळे आताच्या परिस्थितीत कोरोनापेक्षा उपासमारीने लोकांचा जीवन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊननंतर पोटाला चिमटा घेऊन बँका, पतसंस्था, पतपेढ्या, बचत गट व खासगी फायनान्स यांच्याकडून घेतलेले कर्ज परत फेडण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, या लॉकडाऊनमुळे पुन्हा हे अर्थचक्र थंडावल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा आदेश तत्काळ रद्द करून जनतेला खुलेआम जगण्याची परवानगी द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावर जिल्हाध्यक्ष राजभाऊ ओव्हाळ यांच्यासह रिपाइंचे जिल्हा संघटक सचिव प्रताप कदम, मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे आदींच्या सह्या आहेत.

चौकट.......

रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवा

भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी आठवड्याची हक्काची असलेली बाजारपेठ बंद करून शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे. जनावरांचे दूध सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास काढले जाते. ते विक्री करण्यासाठी आपण बंदी केल्यामुळे त्या दुधाची अक्षरश: नासाडी होत आहे, शिवाय सायंकाळी ७ वाजल्यानंतर जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे मोलमजुरीच्या कामावरून सुट्टी झाल्यानंतर भाजीपाला, तेल, मीठ, मिरची व जीवनावश्यक साहित्य कुठे व कसे खरेदी करायचे, असा प्रश्नही सर्वसामान्यांना सतावत आहे. त्यामुळे रात्री किमान १० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.