शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शेतीच्या वादातून विधानभवनाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 29, 2022 18:50 IST

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी सुभाष उंबरे-देशमुख यांचा शेतजमिनीवरुन स्वत:च्या भावासोबतच वाद सुरु होता.

उस्मानाबाद : शेतजमिनीच्या वादातून अधिवेशन काळात विधानभवानाबाहेर पेटवून घेतलेल्या तांदुळवाडी येथील शेतकऱ्याचा सोमवारी दुपारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. याबाबतच्या वृत्तास उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला.

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी सुभाष उंबरे-देशमुख यांचा शेतजमिनीवरुन स्वत:च्या भावासोबतच वाद सुरु होता. यातूनच अधिवेशन सुरु असताना २३ ऑगस्ट रोजी विधानभवनाबाहेर सुभाष देशमुख यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी धाव घेऊन त्यांना वाचविले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मुंबईतील जे.जे. रुग्णाललयातील प्लास्टिक सर्जरी विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुभाष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

तत्पूर्वी पोलिसांनी त्यांनी दिलेल्या जबाबात आपल्या नावावरील शेतजमीन भावाने हडपल्याचे कारण सांगितले होते. दरम्यान, आत्मदहन करण्याच्या काही दिवस अधीच सुभाष देशमुख हे वाशी ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी गेल्याची माहिती आहे. नंतर आत्मदहनासारखे गंभीर पाऊल त्यांनी उचलले. सभागृहातही यावर चर्चा झाली. परिणामी, वाशीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी