शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

शेतीच्या वादातून विधानभवनाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Updated: August 29, 2022 18:50 IST

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी सुभाष उंबरे-देशमुख यांचा शेतजमिनीवरुन स्वत:च्या भावासोबतच वाद सुरु होता.

उस्मानाबाद : शेतजमिनीच्या वादातून अधिवेशन काळात विधानभवानाबाहेर पेटवून घेतलेल्या तांदुळवाडी येथील शेतकऱ्याचा सोमवारी दुपारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. याबाबतच्या वृत्तास उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला.

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी सुभाष उंबरे-देशमुख यांचा शेतजमिनीवरुन स्वत:च्या भावासोबतच वाद सुरु होता. यातूनच अधिवेशन सुरु असताना २३ ऑगस्ट रोजी विधानभवनाबाहेर सुभाष देशमुख यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी धाव घेऊन त्यांना वाचविले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मुंबईतील जे.जे. रुग्णाललयातील प्लास्टिक सर्जरी विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असताना २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुभाष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

तत्पूर्वी पोलिसांनी त्यांनी दिलेल्या जबाबात आपल्या नावावरील शेतजमीन भावाने हडपल्याचे कारण सांगितले होते. दरम्यान, आत्मदहन करण्याच्या काही दिवस अधीच सुभाष देशमुख हे वाशी ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी गेल्याची माहिती आहे. नंतर आत्मदहनासारखे गंभीर पाऊल त्यांनी उचलले. सभागृहातही यावर चर्चा झाली. परिणामी, वाशीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी