शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पुलवामा हल्ल्यामुळे खारिक महागले; काश्मिरमार्गे येणारा माल थांबल्याने परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:37 IST

खारकांची आयात थांबल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा खारिक व खोबऱ्यांच्या किंमती वाढल्या

उस्मानाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा सण अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे़ या सणाला खारिक व खोबऱ्यांच्या हारांचा विशेष मान असतो़ परंतु,  दीड महिन्यापूर्वी काश्मिर मधील पुलवामा येथील भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मिर मार्गे येणाऱ्या खारकांची आयात बंद झाली असून, यामुळे खारिक प्रतिकिलो ५० रुपयांनी महागली आहे़ 

मराठी वर्षाचा प्रारंभ गुढी पाडवा सणाने होतो़ यानिमित्त  प्रत्येक घरावर गुढी उभारली जाते़ गुढीवर साखरेसोबतच खारिक व खोबऱ्यांचा हार लावण्यात येत असतो़ त्याचबरोबर घरातील बच्चे कंपनींना हार दिला जातो़ दरम्यान दीड महिन्यापूर्वी काश्मिरातील पुलवामा येथे दहशतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील काही जवान शहिद झाले होते़ त्यामुळे कश्मिरमार्गे येणाऱ्या खारकांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़  त्यामुळे गुढीपाडव्याला लागणाऱ्या खारिक व खोबऱ्यांचे हार महागले आहेत़ गतवर्षी ७० रुपये किलोने मिळणारी खारिक यंदा १२० रुपये किलोने विक्री होत आहे़ खारकांची आयात थांबल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा खारिक व खोबऱ्यांच्या हारांच्या किंमतीही २५ टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ 

आहे त्या मालावरच हार निर्मितीफेबु्रवारी महिन्यात झालेल्या पुलवामा हल्यामुळे काश्मिर मार्गे येणारी खारकांची आयात बंद झाली आहे़ त्यामुळे गुढीपाडव्यासाठी  उपलब्ध खारकांवरच हार निर्मिती करण्यात आली़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा खारिक ५० रुपये किलोने महागली आहे़ - महेश चौधरी , व्यापारी 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMarketबाजारfruitsफळे