शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन; दररोज १५ हजार भाविकांना मिळणार मंदिरात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 14:00 IST

मंदिरे उघडली जात असली तरी मोठ्या उत्सवांना, यात्रांना परवानगी मिळालेली नाही.

ठळक मुद्देदीड वर्षांनंतर घेता येणार प्रत्यक्षात दर्शनपरराज्यातील भाविकांना दोन्ही डोस घेणे बंधनकारक

उस्मानाबाद : जवळपास दीड वर्षानंतर मंदिरांची दारे आता उघडी होत असून, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून भाविकांना देवदर्शन घडणार आहे. तुळजापुरातही मंदिर उघडण्यात येत असून, दररोज १५ हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. यामध्ये परराज्यातील भाविक असतील तर त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. लस घेतली नसल्यास त्यांचा ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आवश्यक असणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या कालावधीत तुळजापुरात लाखो भाविकांची वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढलेल्या आदेशानुसार दररोज पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंतच्या कालावधीत १५ हजार भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. मात्र, हा प्रवेश केवळ दर्शनासाठी असेल, इतर विधी भाविकांना करता येणार नाहीत. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मल गन असणार आहे. मंदिरात रांगेतील भाविकांनी एकमेकांपासून ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. नवरात्र काळात जिल्ह्यात प्रवेश करताना परराज्यातील भाविकांना किंबहुना अन्य प्रवाशांनाही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे. ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांनी ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा १४ दिवस विलगीकरण पूर्ण केलेले असणे बंधनकारक असणार आहे.

कोजागिरीला तीन दिवस जिल्हाबंदी...मंदिरे उघडली जात असली तरी मोठ्या उत्सवांना, यात्रांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नवरात्रीनंतर कोजागिरीला भरणारी तुळजाभवानीची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. कोजागिरी यात्रेला भाविकांची लाखोंच्या संख्येत गर्दी उसळत असते. ही बाब लक्षात घेऊन १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीतील तीन दिवस राज्यातील तसेच राज्याबाहेरील भाविकांना जिल्हाबंदी असणार आहे. या काळात राज्यातील व राज्याबाहेरील कोणालाही तुळजापुरात प्रवेश मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद