शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
3
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
4
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
5
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
6
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
7
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
8
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
9
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
10
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
11
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
13
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
14
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
15
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
16
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
17
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
18
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
19
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
20
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शाळा परिसरात साप, विंचवाचा धोका; झाडेझुडपेही वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

लोहारा : कोरोनामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद, संस्थेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांमध्ये झाडेझुडपे, गवत वाढले असून, साप, विंचवाचा धोका ...

लोहारा : कोरोनामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद, संस्थेच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांमध्ये झाडेझुडपे, गवत वाढले असून, साप, विंचवाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोहारा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६८ तर खाजगी संस्थेच्या ४३ शाळा आहेत. जिल्हा परिषदेचे ३४७ तर खाजगी २८० शिक्षक आहेत. तालुक्यात विद्यार्थी १६ हजार ५४९ आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून शाळा बंद आहेत. त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुरुजी शाळेपासून दूरच असल्याचे चित्र होते. मात्र, दुसऱ्या लाटेत शिक्षकांना शाळेत हजेरी लावण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शाळेत पन्नास टक्के शिक्षक हजेरी लावत असले तरी काही ठिकाणी गुरुजीच शाळेत जात नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मागील वर्षापासून शाळा बंद असून, या परिसराच्या स्वच्छतेकडेही काही ठिकाणी दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शाळा परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून, वर्गखोल्यांचीही दुरवस्था झाली आहे. काही शाळांत शिक्षक स्वत: स्वच्छता करीत असल्याचीही उदाहरणे असली तरी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळा परिसरात झाडेझुडपे, गवत वाढल्यामुळे साप, विंचवाचा धोका नाकारता येत नाही. तसेच वर्गखोल्याही बंद असल्याने जाळ्या, धूळ साचली आहे.

शिक्षकांची उपस्थिती किती ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरू नसल्या तरी शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

परंतु, पन्नास टक्के उपस्थितीच्या सूचना असल्या तरी काही शाळांत पन्नास टक्केही गुरुजी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे.

वर्गखोल्यांमधील धूळ हटेना

कोरोनामुळे शाळा बंद असून, वर्गखोल्याही कुलूपबंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खोल्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जाळ्या, धूळ साचल्याचे चित्र आहे.

काही लहान शाळांत मात्र उपस्थित शिक्षकांकडून शाळा व वर्गखोल्यांची स्वच्छता केली जात नसल्याचेही दिसून येते.

जबाबदारी कोणाची?

प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती स्थापन केली जाते. या समितीच्या माध्यमातून शाळेची कामे, शाळेच्या सुविधा व गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाते.

विद्यार्थ्यांविना शाळा बंद असल्याने बऱ्याच शाळेत अस्वच्छता आहे. यामुळे शाळा स्वच्छतेची नेमकी जबाबदारी कोणाची, हा मोठा प्रश्न आहे.