शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

काढणीला आलेल्या उडीद, मुगाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST

मुरुम : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे उडीद, मुगाच्या राशी खोळंबल्या असून, ...

मुरुम : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून अधूनमधून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे उडीद, मुगाच्या राशी खोळंबल्या असून, काढणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

मुरुम शहर व परिसरातील आलूर, केसरजवळगा, कोथळी, बेळंब, अचलेर, कंटेकूर, तुगाव, नाईकनगर, भुसणी आदी भागांत मागील दहा दिवसांपासून उडीद, मुगाच्या राशी सुरू आहेत. मात्र, ऐन काढणीच्या काळात अधुनमधून पाऊस येत असल्याने ही पिके पाण्यात भिजून नुकसान होत आहे. शिवाय राशीच्या लागवडीचा खर्च देखील दुपटीने वाढला आहे. अनेक संकटांवर मात करून शेतकऱ्यांनी वर्षभर काबाडकष्ट करून आपल्या शेतात पिके जगवली. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे लागवडसाठीचा खर्च जाऊन पदरात दमडाही पडत नसल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे.

सोमवारी पहाटे शहर व परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. रात्री पुन्हा साडेआठच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला. पहाटेपर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. या पावसामुळे परिसरातील काढणीला आलेल्या उडीद, मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. पेरणी व राशीच्या लागवडीचा खर्च कुठून व कसा करायचा? कर्ज कसे फेडायचे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. मंगळवारीही दिवसभर परिसरात ढगाळ वातावण होते.

चौकट........

बाजार समितीत आवकही घटली

मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ दिवसांपासून दररोज चारशे ते पाचशे पोते उडीद आणि मुगाची आवक विक्रीसाठी येत होती. मात्र, पावसामुळे आणि सुट्यांमुळे आवकदेखील सोमवारी व मंगळवारी मंदावल्याचे दिसून आले. पावसामुळे राशी खोळंबल्याने आवकही मंदावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच बाजार समितीलाही पावसाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते. या बाजार समितीत उडदाला ७ हजार २०० ते ६ हजार ३०० रुपये भाव होता, तर मुगाला ७ हजार ते ६ हजार ५०० रुपये भाव होता.

यंत्राद्वारे मळणीच्या दरात दुपटीने वाढ

केसरजवळगा येथील शेतकरी अनिल गुरव यांनी आपल्या तीन एकरांत उडीद आणि तुरीची पेरणी केली आहे. सध्या उडीद काढणीला आला आहे. मात्र, ऐन काढणीच्या काळात पाऊस झाल्याने संपूर्ण उडीद पाण्यात भिजून हजारो रुपयांचे नुकसान झाले. राशीसाठी मजूरही वेळेवर मिळत नसल्याने पंचायत झाली आहे. मळणी यंत्रवालेही ५० किलोच्या एका पोत्यासाठी ३०० ते ४०० रुपये आकारत आहेत. शेतमजूर आणि मळणीयंत्र मालकाच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. मागील वर्षी २०० रुपये दर होता. मात्र, या वर्षी डिझेलचे भाव वाढल्याचे कारण पुढे करून मळणीचे भाव चक्क दुपटीने वाढवले आहेत.